Heatwave Alert: राज्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार असे संकेत मिळत असतानाच उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नव्या उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
मंगळवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट नागरिकांना जाणवली. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे; तसेच नाशिक आणि पुण्याचा घाट परिसर येथे गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट नागरिकांना जाणवू शकते. यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड येथे बुधवार ते शुक्रवार, हिंगोली आणि नांदेड येथे गुरुवार आणि शुक्रवार या कालावधीत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती येथे बुधवारपासून, तर वर्धा येथे शुक्रवारी आणि शनिवारी उष्णतेची लाट जाणवू शकते.
Mumbai News: ‘एल निनो’चं संकट असतानाच मुंबईत जलाशयात घट; महापालिकेचे मोठा निर्णय, 15 मेपासून संपूर्ण शहरात पाणीकपात
अकोला येथे ४५.६, तर अमरावती येथे ४५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जळगाव येथेही कमाल तापमानाचा पारा ४५.५ अंशांपर्यंत पोहोचला होता. अहिल्यानगर, जेऊर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर येथेही कमाल तापमान ४० अंशांपलीकडे होते.
दिवसाप्रमाणे रात्रीही उकाडा
नाशिक परिसरात कमाल तापमानात वाढ झाली आहे. मालेगाव शहर व तालुक्यात उन्हाचा प्रकोप वाढतच असून, मंगळवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मनमाड शहर व परिसरात उन्हाच्या कडाक्याने शहरवासीय हैराण झाले असून, मंगळवारी या मोसमातील सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. एरव्ही गारठ्याच्या बातम्यांमध्ये सातत्याने गाजणारे निफाड यंदा तापमानाच्या आकडेवारीसाठी गाजत आहे. निफाडमध्ये यावर्षी उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी निफाड तालुक्यात ४३ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका उष्णतेने होरपळून निघाल्याचा प्रत्यय आला.
हवामानाचा आता स्थानिक अंदाज
जागतिक हवामान बदलाच्या काळामध्ये एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणीही वेगवेगळे वातावरण अनुभवायला मिळते. मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी खूप पाऊस पडतो, त्याचवेळी दुसऱ्या ठिकाणी पावसाचा फारसा तडाखा बसत नाही, असेही आढळून आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाचा अंदाज आवश्यक असतो. या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय हवामान विभागातर्फे ‘कृत्रीम प्रज्ञे’वर (एआय) आधारित दोन विशेष प्रणालींचे लोकार्पण करण्यात आले.
Mumbai News: वाहनांनंतर सागरी किनारा मार्गावर हेलिकॉप्टरचे उड्डाण; वरळी जेट्टीवर उभारणार ‘हेलिपॅड’, कसा होणार फायदा?
भारतीय हवामान विभागातर्फे हवामान पूर्वानुमानासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘एआय’वर आधारित असलेल्या या पहिल्याच प्रणाली आहेत. एका प्रणालीआधारे भारताच्या विविध भागांमध्ये मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवण्यात येणार आहे, तर दुसरी प्रणाली उत्तर प्रदेशासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असून या माध्यमातून पावसाच्या अंदाजासंदर्भातील तपशीलवार माहिती मिळेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते या प्रणालींचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), पुणे आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग यांनी या प्रणाली संयुक्तपणे विकसित केल्या आहेत.
