Father Dies on Daughter Wedding Day : विवाहाची घटिका जवळ आली, पाहुणे मंडळी जमली, त्यामुळे ‘वडील उपचार घेत आहेत, ते पूर्ण करून परत येतील,’ असे मुलीला समजावत दुपारी तिचे लग्न पार पाडले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हुसेन मेमन, जव्हार, पालघर : मुलीला आयुष्यभराचा साथीदार शोधून देऊन, डोक्यावर अक्षता टाकून तिची पाठवणी करणे हा कोणत्याही बापासाठी समाधानाचा दिवस असतो. मात्र मुलीच्या विवाह सोहळ्याच्या दिवशीच तिच्या डोक्यावरील वडिलांचे मायेचे छत्र हरपल्याची हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातून समोर आली आहे. दत्तात्रय उबाळे (६०) असे या वडिलांचे नाव आहे.
विवाहाच्या धावपळीत पित्याची प्रकृती बिघडली
मोखाडा तालुक्यातील दत्तात्रय उबाळे (६०) यांची मुलगी हर्षदा हिचा विवाह सोहळा मोखाडा येथे रविवारी दुपारी होता. त्याची धावपळ सुरू असतानाच, रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वडिलांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना प्रथम मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, नंतर नाशिकमधील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. CISF Jawan VIDEO : सर, आईला भेटू का पटकन? एअरपोर्टवर तरुणाची CISF अधिकाऱ्यांना विनवणी, खाकी वर्दीतली माणूसकी जागी, घळाघळा रडणाऱ्या माऊलीला लेक बिलगला
बाबा रुग्णालयात, समजूत काढत मुलीचं लग्न
दुसरीकडे, विवाहाची घटिका जवळ आल्याने, पाहुणे मंडळी जमल्याने ‘वडील उपचार घेत आहेत, ते पूर्ण करून परत येतील,’ असे मुलीला समजावत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लग्न पार पाडले. उशिरापर्यंत नवऱ्या मुलीला याबाबत कल्पना देण्यात आली नव्हती. नंतर वडिलांच्या निधनाची बातमी सांगताच, लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला. नातेवाईक आणि पाहुण्यांनाही अश्रू अनावर झाले.
Iran vs US संघर्षामुळे देश संकटात, मोदींच्या आवाहनानंतर चर्चेला उधाण, ही लॉकडाऊनची सुरुवात ?
हळद लावली, अक्षता टाकण्याआधी निरोप
दत्तात्रय उबाळे यांनी तहसील कार्यालयात नोकरी केल्यानंतर वयोमानानुसार सेवानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या चार मुलींपैकी मोठ्या दोघींचे लग्न झाले होते. तर तिसरी मुलगी हर्षदा हिचे लग्न ठरल्याने मागील महिनाभरापासून त्यांनी मुलीच्या लग्नासाठी उत्साहात तयारी केली होती. शनिवारी मुलीच्या हळदीचा कार्यक्रमही उत्साहात केला होता. मात्र तिच्या डोक्यावर अक्षता टाकण्याआधीच त्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Ahmedabad Family Kidnap : एक कोटी मोजून भारतीय कुटुंबाचं लंडनला ‘अवैध’ पलायन, पण एजंटने घात केला, अपहरण करुन ओलीस ठेवलं, बाबा खानच्या फोनने ट्विस्ट
जळगावात यापूर्वी दोन वधूंचा मृत्यू
दरम्यान, संसाराची स्वप्नं डोळ्यात साठवलेल्या दोन तरुणींचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्याच्या घटना काहीच दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात घडल्याचं समोर आलं होतं. लग्न झाल्यानंतर माहेरी जाताना अपघात होऊन नववधूसह तिघा जणांचा मृत्यू झाला, तर वणी गडावर देवीला लग्नाची पहिली पत्रिका अर्पण करून परत येत असताना झालेल्या अपघातात वाग्दत्त वधूसह तिच्या वहिनीचा दुर्दैवी अंत झाला होता.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा