Mumbai Water Cut: यंदा वाढत्या उष्णतेमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यात एल निनोच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असले तरी नागरिकांना येत्या काही दिवसांत पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. ‘ एल निनो ‘मुळे देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबईत 15 मे पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच, यंदा राज्यात तापमानही शिगेला पोहोचले आहे. त्यामुळे शहरातील सात तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
सातही जलशयांमध्ये घट
संपूर्ण मुंबई शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वरचा वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी आणि मोडकसागर या सात तलांमधून होतो. या सात तलावांमध्ये मिळून 1.447 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सोमवारी, या सात तलावांमधील पाणीसाठा चक्क 34 लाखांवर पोहोचला. तलावांच्या क्षमतेपेक्षा हा 23.52 टक्क्यांनी खाली आला आहे. याच दिवशी, गेल्या वर्षी पाणीसाठी 20.26 टक्क्यांनी कमी झाला होता आणि 2024मध्ये फक्त 14.73 टक्क्यांनी कमी झाला होता. यंदा उष्णता वाढल्यामुळे पाण्याच्या साठ्यावर परिणाम दिसून येत आहे.Maharashtra Weather: तापमानाने गाठला दहा वर्षांचा उच्चांक! पुन्हा पारा चाळिशीजवळ; तापमान वाढीचं नेमकं कारण काय?
यामुळे खबरदारीचा इशारा घेत महापालिकेने शहरात 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे आयएमडीने यंदा सरासरीपेक्षा कमी मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पाणीपुरवठा कमी करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने दिले आहे. या आधारे महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला.
पण एल निनोचा फटका बसण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. 2015 आणि 2026मध्येही भारताने एल निनोचा प्रभाव अनुभवला होता. एल निनोमुळे जून, जुलै आणि ऑगस्ट म्हणजे मुख्य मान्सूनच्या महिन्यांमध्ये पाऊस कमी पडतो. त्यासह उष्णतेची पातळीही वाढू लागते. त्यामुळे यंदाही पाऊस कमी झाल्यास नागरिकांसाठी पुरेसा पाणीपुरवठा असावा यासाठी पावले उचलली जात आहेत.
ऑगस्टपर्यंत पुरेसा साठा
मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी 28 एप्रिल रोजीच पाणीकपातीची घोषणा केली होती. पण जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार सोमवारी अधिकृत निर्णय घेण्यात आला. एल निनोमुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरू ठेवणे हे यामागील मुख्य उद्देश्य आहे.
Mumbai News: मुंबईतील पहिल्या भुयारी बोगद्याचं खोदकाम वेगात; 250 मीटर काम पूर्ण; मध्य-पश्चिम रेल्वे आणि मेट्रोखालून मार्ग
दरम्यान, महापालिकेने नागरिकांना घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आश्वासन दिले आहे. सध्याचा शिल्लक पाणीसाठा आणि पाणीकपातीमुळे वाचलेल्या पाण्यामुळे मुंबईत 17 ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करणं शक्य होणार आहे. तसेच, मुंबईसह ठाणे, भिवांडी-निजामपूर महापालिकेकडून देखील पाणीकपातीची घोषणा करण्यात आली आहे. या शहरांमध्येही 10 टक्के पाणीकपात होणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा