Virar-Alibaug Corridor Phase 1: ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधील 104 गावांमधून विरार-अलिबाग कॉरिडोर बांधला जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या या मार्गामुळे मोठा फायदा होईल
कोणत्या महामार्गांना जोडणार?
वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग तालुक्यांमधील 104 गावांमधून हा कॉरिडॉर उभारला जाणार आहे. त्यासह NH -48 (मुंबई-अहमदाबाद), NH -848 (मुंबई-आग्रा), NH-61 (कल्याण-मुरबाद-निर्मल), मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि NH -66 (मुंबई-गोवा महामार्ग) यासह अनेक प्रमुख महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांना जोडेल. या मार्गावर नऊ इंटरचेंजेस बांधले जाणार आहेत.
Navi Mumbai News: ऐरोली-काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण, शिळफाट्यावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे-नवी मुंबई प्रवासात वेळ वाचणार
मुंबईतील अतिगर्दीच्या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ चक्क 90 मिनिटांनी कमी होणार आहे. विरार-अलिबाग कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्यात 96.41 किमी मार्ग उभारला जाणार आहे. वसई तालुक्यातील नावघर येथबन पेण तालुक्यातील बालावालीपर्यंत हा टप्पा असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण या मार्गाचं बांधकाम करणार आहे.११ मार्च रोजी झालेल्या कॅबिनेट इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीच्या बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या मार्गाला ‘मल्टिमॉडल’ का म्हणतात?
99 मीटर रुंदी असलेल्या या मार्गावर अनेक वाहतूक आणि नागरी सुविधांचे एकत्रीकरण होणार आहे. यामध्ये 8 पासून 14 पदरी मार्गांचा समावेश आहे. ताशी 120 किमी वेगाने प्रवास करणं यामुळे शक्य होणार आहे. तसेच, बसच्या वाहतुकीसाठी एक स्वतंत्र मार्गिका, सायकल ट्रॅक आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथ देखील उभारले जातील. तसेच, मार्गाखालून गॅस, पाणी आणि ऑप्टिकल फायबरचे केबलची सोय असल्यामुळे या मार्गाला मल्टिमॉडेल (बहुउद्देशीय) मार्ग म्हटले जाते आहे.
मार्गाच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, कल्याण आणि पनवेल यांसारख्या शहरांमधील प्रवास सोपा होणार आहे. दुसऱ्या टप्पा बलवली ते अलिबागपर्यंत बांधला जाणार आहे. हा मार्ग 29.9 किमी लांब असेल. हे दोन्ही टप्पे पूर्ण होताच, विरार ते अलिबागमधील अंतर कमी होणार आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी 39,793 कोटी रुपये खर्च येणार असून भूसंपादनासाठी 22,000 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च होणार आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून सरकारने मार्गाच्या बांधकामासाठी 3 वर्षांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे 2029च्या अखेरीस किंवा 2030च्या सुरुवातीपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
Weather Update: उन्हाचा तडाखा कमी होणार! अंदमानात यंदा मान्सूनआगमन लवकर; काय सांगतो ‘स्कायमेट’चा अंदाज?
तिसऱ्या मुंबईचा कणा
विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडो रायगड तालुक्यात उभारली जाणाऱ्या तिसऱ्या मुंबईचा कणा मानला जाणार आहे. यामुळे प्रवासात जवळजवळ 50 टक्के वेळ वाचणार आहे. मुंबई आणि ठाण्यातून जाणारी अवजड वाहने आता या बाह्य वळण मार्गावर वळवली जातील. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
