• Mon. Jun 15th, 2026

    तिसऱ्या मुंबईचा कणा, 104 गावांमधून मार्ग, 6 महामार्गांना जोडणार; 14 पदरी ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’ला मंजुरी

    तिसऱ्या मुंबईचा कणा, 104 गावांमधून मार्ग, 6 महामार्गांना जोडणार; 14 पदरी ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’ला मंजुरी

    Virar-Alibaug Corridor Phase 1: ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधील 104 गावांमधून विरार-अलिबाग कॉरिडोर बांधला जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या या मार्गामुळे मोठा फायदा होईल

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पालघर: विरार-अलिबाग कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. या मार्गामुळे मुंबई शहरासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि जवाहरलाल नेहरू बंदरासारख्या महत्त्वाच्या मार्गांना जोडणार आहे. 126.06 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 31,793.47 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

    कोणत्या महामार्गांना जोडणार?

    वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग तालुक्यांमधील 104 गावांमधून हा कॉरिडॉर उभारला जाणार आहे. त्यासह NH -48 (मुंबई-अहमदाबाद), NH -848 (मुंबई-आग्रा), NH-61 (कल्याण-मुरबाद-निर्मल), मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि NH -66 (मुंबई-गोवा महामार्ग) यासह अनेक प्रमुख महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांना जोडेल. या मार्गावर नऊ इंटरचेंजेस बांधले जाणार आहेत.Maharashtra TimesNavi Mumbai News: ऐरोली-काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण, शिळफाट्यावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे-नवी मुंबई प्रवासात वेळ वाचणार

    मुंबईतील अतिगर्दीच्या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ चक्क 90 मिनिटांनी कमी होणार आहे. विरार-अलिबाग कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्यात 96.41 किमी मार्ग उभारला जाणार आहे. वसई तालुक्यातील नावघर येथबन पेण तालुक्यातील बालावालीपर्यंत हा टप्पा असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण या मार्गाचं बांधकाम करणार आहे.११ मार्च रोजी झालेल्या कॅबिनेट इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीच्या बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    या मार्गाला ‘मल्टिमॉडल’ का म्हणतात?

    99 मीटर रुंदी असलेल्या या मार्गावर अनेक वाहतूक आणि नागरी सुविधांचे एकत्रीकरण होणार आहे. यामध्ये 8 पासून 14 पदरी मार्गांचा समावेश आहे. ताशी 120 किमी वेगाने प्रवास करणं यामुळे शक्य होणार आहे. तसेच, बसच्या वाहतुकीसाठी एक स्वतंत्र मार्गिका, सायकल ट्रॅक आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथ देखील उभारले जातील. तसेच, मार्गाखालून गॅस, पाणी आणि ऑप्टिकल फायबरचे केबलची सोय असल्यामुळे या मार्गाला मल्टिमॉडेल (बहुउद्देशीय) मार्ग म्हटले जाते आहे.

    मार्गाच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, कल्याण आणि पनवेल यांसारख्या शहरांमधील प्रवास सोपा होणार आहे. दुसऱ्या टप्पा बलवली ते अलिबागपर्यंत बांधला जाणार आहे. हा मार्ग 29.9 किमी लांब असेल. हे दोन्ही टप्पे पूर्ण होताच, विरार ते अलिबागमधील अंतर कमी होणार आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी 39,793 कोटी रुपये खर्च येणार असून भूसंपादनासाठी 22,000 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च होणार आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून सरकारने मार्गाच्या बांधकामासाठी 3 वर्षांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे 2029च्या अखेरीस किंवा 2030च्या सुरुवातीपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

    Maharashtra TimesWeather Update: उन्हाचा तडाखा कमी होणार! अंदमानात यंदा मान्सूनआगमन लवकर; काय सांगतो ‘स्कायमेट’चा अंदाज?

    तिसऱ्या मुंबईचा कणा

    विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडो रायगड तालुक्यात उभारली जाणाऱ्या तिसऱ्या मुंबईचा कणा मानला जाणार आहे. यामुळे प्रवासात जवळजवळ 50 टक्के वेळ वाचणार आहे. मुंबई आणि ठाण्यातून जाणारी अवजड वाहने आता या बाह्य वळण मार्गावर वळवली जातील. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा