Pydhonie Watermelon Deaths Case : उंदीर मारण्याचे औषध बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असून ते घेतल्यानंतर शरीरात फॉस्फीन गॅस तयार होतो. त्यामुळे हृदय, किडनी तसेच श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊन मृत्यू ओढवतो. तीव्रता अधिक असल्याने लहान मुलीचा मृत्यू सर्वप्रथम झाला असावा
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा मृत्यू हा उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचे निष्पन्न झाले असून, अत्यंत तीव्र मात्रेचे हे औषध त्यांनी सेवन केलेल्या कलिंगडामध्ये आढळून आले आहे. औषधातील विषारी फॉस्फीन गॅसमुळे चौघांचा मृत्यू ओढवल्याचा निष्कर्ष फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, वैद्यकीय कारण समजलं, तरी एका प्रश्नाचं उत्तर मिळणं बाकी आहे, ते म्हणजे चौघांनी जीवन संपवलं की त्यांचा कोणी जीव घेतला.
उलट्यांमुळे पाणी-औषधाचा अंश शरीराबाहेर
दक्षिण मुंबईतील पायधुनी येथे राहणाऱ्या चौघांच्या मृत्यूंचे कारण तपासण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबकडे नमुने देण्यात आले होते. वैद्यकीय तसेच रासायनिक विश्लेषण झाल्यानंतर निदाननिश्चिती होण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. मात्र डोकाडिया कुटुंबीयांनी या औषधांचे सेवन केल्यानंतर त्यांना उलट्या सुरू झाल्या व पोटातील पाण्याचा तसेच उंदीर मारण्याच्या औषधाचा अंश शरीराबाहेर पडला. त्यामुळे पोटातील अंतर्गत स्रावाचे जे नमुने लॅबला पाठवण्यात आले, त्यामध्ये विषाची मात्रा पहिल्या पडताळणीमध्ये आढळून आली नाही.
फॉस्फीन गॅस तयार होऊन गंभीर परिणाम
यानंतर पुन्हा रासायनिक चाचण्या कराव्या लागल्या. त्यामुळे हा विलंब झाला अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली. उंदीर मारण्याचे औषध बाजारामध्ये सहज उपलब्ध होते. ते घेतल्यानंतर फॉस्फीन गॅस तयार होऊन हृदय, किडनी तसेच श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो व मृत्यू ओढवतो. तीव्रता अधिक असल्याने लहान मुलाचा मृत्यू सर्वप्रथम झाला. त्रास सुरू झाल्यावर डोकाडिया कुटुंबास सर्वप्रथम ज्या डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार दिले, त्यांच्या ही बाब लक्षात आली नाही का, त्यांनी तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला का दिला नाही, असे प्रश्नही उपस्थित झाले आहेत.
Salil Ankola : आईच्या निधनानंतर सावरणं कठीण; माजी क्रिकेटपटू सलील अंकोला पुण्यातील पुनर्वसन केंद्रात; पत्नी म्हणाली, पहिल्या प्रेमाकडे लवकरच परतेल
मृत्यू मॉर्फिनमुळे नाही
मृत्यूचे वैद्यकीय कारण समजले असले, तरी ही आत्महत्या होती की हत्या, हे पोलिस तपासामधून निष्पन्न होईल, असे संबंधित विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
उंदीर मारण्याचे औषध कलिंगडामधून का घेतले, ते सर्वप्रथम आणि अखेरीस कुणी घेतले, यामागील कारण काय, याचाही तपास करण्यात येणार आहे. डोकाडिया कुटुंबाच्या शरीरामध्ये मॉर्फिन या औषधाचे अंश सापडले नाहीत. त्यामुळे हे मृत्यू मॉर्फिनची अतिरिक्त मात्रा घेतल्यामुळे झालेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार डोकाडिया यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. आर्थिक विवंचनेमुळे आलेल्या नैराश्यातून हे कृत्य झाले, की त्यामागे अन्य कोणती कारणे आहेत, यादृष्टीने यंत्रणा तपास करणार आहे. Solapur Crime : भावजयीसह तिच्या दोन लेकरांचा जीव घेतला, सोलापुरात ट्रिपल मर्डर, आरोपी दीर पश्चिम बंगालमध्ये सापडला, वहिनीच्या तगाद्यामुळे खून
अतिरिक्त जंतुसंसर्गाची वाढ
ज्या मुलीचे शवविच्छेदन पोलिस सर्जन यांच्या देखरेखीखाली करण्यात आले, तिच्याबाबत जे. जे. रुग्णालय प्रशासनाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने दिलेल्या अहवालामध्ये ‘विषबाधेमुळे अतिरिक्त जंतुसंसर्गाची वाढ’ असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इतर तीन जणांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा