• Sat. Jun 6th, 2026
    Thane Water Cut: ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद! मुंब्रा, दिवा, कळव्यामधील अनेक भागांना फटका; कधी होणार परिणाम?

    Thane Water Supply Cut: ठाण्यात पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं असून या आठवड्यात 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दिवा, मुंब्रा, कळव्यासह मिरा भाईंदरमधीलही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे: उन्हाळा सुरू झाल्यापासूनच ठाणेकरांना पाण्याच्या समस्या भेडसावत आहेत. शहरात पाणीकपात केल्यानंतर आता दर आठवड्याला अनेक भागांतील पाणीपुरवठा खंडीत होत असल्यामुळे ठाणेकरांना पाणी टंचाईच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आता गुरूवार ते शुक्रावर शहरातील अनेक भागांत 24 तास पाणीपुरवठा बंद असेल.

    महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहरातील काही भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवार, 7 मे 2026 रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार, 8 मे 2026 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत हा शटडाऊन लागू राहणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय (HSR) येथे बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक 1, 2 व 3वर उन्नतीकरण करण्यासह तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत असल्यामुळे हा पाणीपुरवठा खंडीत होणार आहे.

    Maharashtra TimesThane News: रस्त्याच्या मधोमध स्थानकं, 3000 झाडांची कत्तल! ठाणे रिंग मेट्रोमुळे कोंडी कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती

    कोणत्या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार?

    या कालावधीत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31) मधील काही भाग वगळता), कळवा या प्रभाग समित्यांतील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.

    दरम्यान, पाणीपुरवठा परत सुरळीत झाल्यावरही नागरिकांना काही दिलासा मिळणार नाही. पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    Maharashtra TimesMumbai-Nashik Highway: शहरातून बाहेर पडताच भुर्दंड बसणार! 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार खारेगाव टोलनाका; मुंबई-नाशिक महामार्गावर टोलवसुली

    मिरा भाईंदरमध्येही पुरवठा बंद राहणार

    याशिवाय मिरा भाईंदरमध्येही 7 मे, गुरूवारी, पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एल निनो च्या प्रभावामुळे यंदा पावसाळा लांबणीवर असून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात लागू केली आहे. त्यानुसार एमआयडीसीकडून शहरात होणारा पाणीपुरवठा या मे महिन्यात दोन वेळा बंद राहणार आहे. 7 मे रोजी आणि 21 मे रोजी शहरातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील.

    7 मे, गुरूवारी दुपारी 12 ते 8 मे रोजी, शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान, 21 मे रोजी, गुरूवारी दुपारी 12 ते 22 मे रोजी, शुक्रवारी दुपारी 12पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा