• Sat. Jun 6th, 2026

    Census In Maharashtra: घरच्यांना घेऊन जा जनगणनेला! प्रशासनातील अधिकाऱ्यांचे उफराटे सल्ले, शिक्षिकांना घरोघरी एकटे फिरण्याची भीती

    Census In Maharashtra: घरच्यांना घेऊन जा जनगणनेला! प्रशासनातील अधिकाऱ्यांचे उफराटे सल्ले, शिक्षिकांना घरोघरी एकटे फिरण्याची भीती

    Census In Maharashtra: जनगणनेसाठी प्रत्येक कुटुंबाशी सविस्तर बोलावे लागत असल्याने प्रत्येक घरी जास्त वेळ थांबावे लागणार आहे. अशावेळी केवळ एका शिक्षिकेने तेथे जाणे हे धोकादायक असल्याची भावना शिक्षिकांनी व्यक्त केली आहे.

    जनगणना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: जनगणना करण्यासाठी प्रशासनाने एकेकट्या महिला शिक्षकांची नियुक्ती केल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शहराच्या विविध भागांमध्ये घरोघरी एकट्याने जाऊन जनगणना करणे धोकादायक असल्याची भावना शिक्षिकांनी व्यक्त केली आहे. यावर कहर म्हणजे ‘तुमच्या नवऱ्याला, घरच्यांना किंवा अन्य कुणाला जाऊन जनगणना करा’, असे उफराटे सल्ले प्रशासनाने दिले आहेत.

    सध्या प्रशासनाच्यावतीने जनगणनेची मोहीम राबविण्यात येते आहे. त्यासाठी, शासकीय आणि खासगी शाळांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळांमध्ये शिक्षिकांचे प्रमाण मोठे असते आणि त्यांना घरोघरी जाऊन ही जनगणना करावयाची आहे. मात्र, त्यासाठी प्रशासनाने प्रत्येक शिक्षिकेला एकेकटे घरोघरी जाऊन तेथील माहिती संकलित करण्यास सांगितले आहे.

    Maharashtra TimesSindhudurg Crime : शाळेत झेंडावंदन केलं, पण घरी परतलीच नाही; कोकणातील शिक्षिका बेपत्ता, फोन लागेना, आठ वर्षांचा लेक व्याकूळ
    शहरातील अनेक भाग हे संवेदनशील आहेत. कित्येक अनोळखी आणि दूरवरच्या भागांमध्ये शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथे एकट्याने जाणे हे कोणत्याही महिलेसाठी असुरक्षित आहे. विशेषत: सध्याच्या वातावरणात या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून महिलांमध्ये भीती आहे. प्रशासनाने जनगणनेसाठी नियुक्ती करताना एका वस्तीत दोन महिलांचा गट अशा प्रकारे नियुक्ती करायला हवी, असे मत शिक्षिकांनी व्यक्त केले आहे.

    Maharashtra TimesChandrapur Crime: नवऱ्याची किंमत 1 लाख; चंद्रपुरात पत्नीकडून स्वत:चंच कुंकू पुसण्याची सुपारी, शाळेच्या परिसरात आढळली बॉडी
    जनगणनेसाठी सध्या शिक्षकांची प्रशिक्षणे सुरू आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शिक्षिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. दोन-दोनच्या गटाने महिलांना जनगणनेसाठी पाठवावे, अशीही विनंती केली. मात्र, प्रशासनाने असा कोणताही तोडगा काढण्याचीही तसदी घेतलेली नाही. ‘तुम्ही तुमच्या नवऱ्याला, घरच्यांना किंवा कुणालातरी घेऊन हे काम पूर्ण करा’, असे सल्ले या अधिकाऱ्यांनी दिले. एक-दोन दिवस कुणी सोबत येईल, पण महिनाभर चालणाऱ्या कामासाठी कुटुंबीय कसे काय येऊ शकतील, असा प्रश्न शिक्षिकांनी विचारला आहे. जिल्हा प्रशासनाने महिला शिक्षिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर व्यावहारिक विचार करून निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा