• Fri. Jun 19th, 2026
    Nagpur News: लग्नाची लगबग सुरु असतानाच तरुण अभियंत्याचा मृत्यू; रात्री झोपला तो सकाळी उठलाच नाही, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    Nagpur Engineer Died In Delhi: घरी लग्नाची लगबग सुरु असतानाच तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हा तरुण दिल्लीत नोकरीनिमित्ताने स्थायिक झाला होता.

    तरुण अभियंत्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: नियतीचा खेळ किती क्रूर असू शकतो, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना वाठोडा परिसरातील चक्रधरनगर येथे घडली. येथील रहिवासी आणि एलआयटीचा माजी विद्यार्थी रोहित धनंजय दलाल (वय २९) याचे दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी ज्या घरात साक्षगंधाचा आनंद होता, जिथे लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते, तिथे आता शोककळा पसरली आहे.

    काय घडलं?

    एलआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोहित नोकरीनिमित्त दिल्लीत स्थायिक झाला होता. आपल्या मेहनतीच्या कमाईतून त्याने वाठोडा येथील ई-नारायणा स्कूलजवळ स्वतःचा फ्लॅटही घेतला होता. दोन आठवड्यांपूर्वीच त्याचा विवाह निश्चित होऊन साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून रोहित झोपला. गुरुवारी सकाळी तो उठलाच नाही. नागपूरहून आईने वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काळजीतून दिल्लीतील त्याच्या मित्रांना संपर्क केला. मित्र त्याच्या घरी पोहोचले तेव्हा रोहित बेशुद्धावस्थेत होता. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
    Maharashtra TimesBageshwar Baba : ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS ला द्या’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य
    झोपेतच हृदयविकाराचा झटका

    झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली. रोहितचे पार्थिव नागपुरात आणल्यानंतर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यापश्चात आई अर्चना, वडील धनंजय (राजू) दलाल, लहान भाऊ समित आणि मोठा आप्तपरिवार आहे .

    Maharashtra TimesNagpur News : अंगणात दुडू-दुडू पावलं टाकणारी चिमुकली संध्या क्षणात दिसेनाशी झाली; बादलीतील पाण्यात…, नागपूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
    तर दुसऱ्या एका घटनेत, महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या अंबेनळी घाटात गुरुवारी सायंकाळी दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा दरीत कोसळून मृत्यू झाला. मोहन चव्हाण आणि राजश्री चव्हाण (रा. वाई) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. प्रतापगड कमानीनजीक ही दुर्घटना घडली. महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमने दरीत उतरून मृतदेह शोधले. मृत दाम्पत्य भंगार व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे. हे दाम्पत्य पोलादपूरहून वाईकडे परत येत होते. त्यांच्या दुचाकीवर भंगार वस्तूंची गाठोडी होती. नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन रेलिंगला धडकली. दुचाकी तिथेच अडकून चव्हाण दाम्पत्य ३०० फूट खोल दरीत कोसळले. बचाव पथकाने खोल दरीत उतरून मदतकार्य सुरू केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा