• Sat. Aug 8th, 2026
    Melghat Haunted School: भुताटकीच्या अफवेने आश्रमशाळा ओस; 608 विद्यार्थ्यांचे पलायन, मेळघाटातील डोमा येथील घटना

    Melghat Haunted School: धारणीतील विषबाधेच्या घटनेनंतर घडलेल्या या प्रकारामुळे आदिवासी पालकांमधील भीती आणि अविश्वासाचे वातावरण वाढले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्याच्या डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींमध्ये विचित्र आणि भीतीदायक लक्षणे दिसून आली. हा भुताटकीचा प्रकार असल्याची अफवा पसरल्याने भीतीपोटी पालकांनी आपल्या मुला-मुलींना आश्रमशाळेतून घरी परत नेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी पटसंख्येवरील सर्व ६०८ विद्यार्थी शाळा सोडून निघून गेले होते.

    डोमा येथील या आश्रमशाळेत २६३ मुले आणि ३४५ मुली निवासी शिक्षण घेतात. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीमध्ये अकारण रडणे, मोठ्याने हसणे, अचानक ओरडणे, शांत बसून राहणे आणि कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद न देणे अशी लक्षणे दिसून आली. पाहता पाहता हीच लक्षणे इतर मुलींमध्येही वेगाने पसरली. अमरावतीहून विशेष समुपदेशन पथक पाचारण करण्यात आले. मात्र, या विचित्र वर्तनामागील मूळ कारण शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले नाही. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकित राठोड यांच्या मते, हा प्रकार ‘मास हिस्टेरिया’ म्हणजेच तीव्र मानसिक तणावाशी संबंधित असल्याची शक्यता आहे.

    Maharashtra TimesSunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची नवी ठिणगी; प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरुन तटकरे यांचा वेगळा सूरशाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे आणि आरोग्य यंत्रणेच्या अस्पष्ट भूमिकेमुळे पालकांचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. आता केवळ अफवांवर नियंत्रण मिळवून भागणार नाही, तर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी मुख्याध्यापक व अधीक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

    Maharashtra TimesSushma Andhare: जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका; पडद्याआड कोणत्या घडामोडी सुरू असल्याचा दावा?प्रशासनाचे मौन आणि संशयाची सुई

    या संपूर्ण घटनेत सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे आश्रमशाळेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापक आणि अधीक्षकांनी धारण केलेले मौन ठरले आहे. आश्रमशाळेत एकामागून एक गंभीर घटना घडत असताना आणि मुले शाळा सोडून जात असतानाही जबाबदार अधिकारी गप्प राहिले आहेत. यामुळे या प्रकारामागे काही प्रशासकीय हलगर्जीपणा किंवा अन्य काही गंभीर कारण तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा