Gang war and firing in chhatrapati sambhajinagar: शहरातील पुंडलिकनगर परिसरात टोळीयुद्धाच्या वादातून भररस्त्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुख्यात गुन्हेगार पवन दिवेकर आणि त्याच्या ‘पीडी कंपनी’ने हनुमान नगर चौकात दोन राऊंड फायर करत दहशत माजवली.
पवन दिवेकर राहणार न्याय नगर असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, रांजणे आणि साळवे या दोन गटात गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमातील वादावरून ठिणगी पडली होती. गुरुवारी रात्री हे दोन्ही गट एकमेकांसमोर आले असता वाद विकोपाला गेला. यावेळी साळवे याने आपल्या मदतीला कुख्यात गुन्हेगार पवन दिवेकर याला बोलावून घेतले.
सिनेस्टाईल एन्ट्री अन् फायरिंगचा थरार
नुकताच कारागृहातून बाहेर आलेला पवन दिवेकर हातात बिअरची बाटली घेऊन शिवीगाळ करत घटनास्थळी दाखल झाला. त्याने अत्यंत थंड डोक्याने टपरीवरून गुटखा खरेदी करून तोंडात टाकला आणि त्याचवेळी कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढून रांजणे गटाला धमकावण्यास सुरुवात केली. रांजणे गटाचा विरोध वाढताच संतापलेल्या दिवेकर याने गर्दीच्या मधोमध उभे राहून हवेत दोन गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच पळापळ झाली.
Nagpur Crime : नागपूरमध्ये खाकीचा धाक संपलाय का? रात्रीच्या गस्तीदरम्यान थेट पीएसआयवर चाकूहल्ला करून पळवली त्यांचीच बुलेट
पोलिसांची धडक कारवाई
घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सायरन वाजवत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या गाड्या पाहताच पवन दिवेकर आणि त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, मात्र पोलिसांनी साळवे याला ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.
कोण आहे ही पीडी कंपनी ?
गोळीबार करणारा पवन दिवेकर हा पीडी कंपनी नावाची टोळी चालवतो. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि शस्त्राने हल्ले करणे असे एकूण १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तू जालन्यातील कुख्यात गुन्हेगार गजानन तर याच्या टोळीत काम करत होता. गजानन दौऱ्याचा खून झाला त्या दिवशी तो गजानन दौऱ्याच्या कारमध्ये देखील होता. नुकताच काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता.सोशल मीडियावर शस्त्रांसह डान्स करण्याचे व्हिडिओ शेअर करून दहशत पसरवण्याचं काम ही टोळी करत आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
