Mumbai Metro Inauguration: गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत मेट्रोचं उद्घाटन रखडलं होतं. मेट्रो लाइन 9 आणि 2 बीच्या सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यावर त्या नागरिकांसाठी सुरू होण्याची अपेक्षा होती. पण अनेक कारणांमुळे वारंवार हा उद्घाटन सोहळा तारखा जाहीर होऊनही पुढे ढकलला गेला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका ९ (टप्पा १) आणि मेट्रो मार्गिका २ बी (टप्पा १) चे लोकार्पण होणार असून, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ आणि पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही याच दिवशी होणार आहे.
तीन ठिकाणी कार्यक्रम
कार्यक्रमाचे आयोजन तीन ठिकाणी करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता दहिसर (पूर्व) मेट्रो स्थानक येथे मेट्रो लाईन ९ संदर्भातील कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता ठाण्यातील मानपाडा येथे ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी टीबीएम लॉन्च करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता चेंबूरमधील डायमंड गार्डन मेट्रो स्थानक येथे मेट्रो लाइन २बीचे लोकार्पण आणि पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन पार पडणार आहे.Mumbai Metro: ‘वचन दिया… पूरा किया!’ उद्घाटनाची तारीख ठरली, पण नेत्यांचा पत्ता नाही; मिरा-भाईंदर मेट्रो पुन्हा रखडली
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. एकाच दिवशी चार महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देत मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराला मोठा वेग देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यामुळे, अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पांना अखेर मुहूर्त मिळाल्याने मुंबईकरांसाठी दिलासादायक घडामोड मानली जात आहे.
दरम्यान, मुंबईत पहिली भूमिगत मेट्रो सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखाचा झाला खरा; मात्र या मेट्रोला पुरविण्यात आलेली सुरक्षा तोकडी असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक स्थानकात खाली उतरण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारावर कोणतीच सुरक्षा नाही. प्रवेशद्वारापासून तपासणी केंद्रापर्यंत (फ्रिस्किंग पॉइंट) सुमारे शंभर ते दोनशे मीटर अंतरावर एकही सुरक्षारक्षक तैनात नाही. निम्म्याहून अधिक स्थानकांतील तपासणी केंद्रांवर तैनात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांकडे शस्त्रेही नाहीत. जी काही मोजकी शस्त्रे आहेत, ती देखील अद्ययावत नसल्याचे वास्तव आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा