Chandrapur Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत वन्यजीवांच्या हल्ल्याशी संबंधित घटनांमध्ये १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मिंथूर येथील रहिवासी हरिदास महादेव कुबडे हे शनिवारी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी आपल्या शेताकडे गेले होते. सायंकाळ होऊनही ते घरी परतले नाही. कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरु केला. रात्र झाल्याने शोध मोहिमेत अडथळा निर्माण झाला. रविवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने आणि ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम राबवली असता, शेताजवळील एका नाल्यालगत हरिदास यांच्या शरीराचे छिन्नविछिन्न अवशेष आढळून आले. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ओढत नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर मिंथुर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
Chandrapur Farmer: किडनी विकलेल्या शेतकऱ्यानं मागितलं इच्छामरण; सावकारपीडित शेतकरी रोशन कुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात वाघाच्या हल्ल्यात ११ तर बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी; २०२५मध्ये वन्यजीवांच्या हल्ल्याशी संबंधित घटनांमध्ये ४७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यापैकी वाघांच्या हल्ल्यांत ४२, बिबट्यांच्या हल्ल्यात तीन तर अस्वल आणि हत्तीच्या हल्ल्यांमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला होता.
Raigad Crime : पतीच्या प्रेयसीने वाद, मार्ग काढण्यासाठी महिला भोंदूबाबाकडे, त्याचे मध्यरात्री विचित्र विधी करत महिलेसोबत अमानुष कृत्य
सहा ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्हीची नजर
परिसरात वाघाचा वावर वाढल्याचे लक्षात घेऊन वनविभागाने गस्त वाढवली आहे. सहा ट्रॅप कॅमेरे व एक सीसीटीव्ही लाइव्ह कॅमेरा लावण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली. दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीची मदत देण्यात आली आहे. नागरिकांनी जंगलात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
