• Sun. Jun 7th, 2026

    Varandha Ghat Closed: पुणे-कोकण जोडणारा वरंधा घाट ‘शटडाऊन’, 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?

    Varandha Ghat Closed: पुणे-कोकण जोडणारा वरंधा घाट ‘शटडाऊन’, 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?

    Pune-Raigad Traffic: पुण्यातील भोरपासून सुरू होऊन रायगडमधील महाडपर्यंत वरंधा घाट आहे. पुणे ते कोकण प्रवासातील हा एक महत्त्वाचा मार्ग असून संपूर्ण महिना बंद असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड: पुणे-कोकणला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा वरंधा घाट मार्ग रस्ते दुरुस्ती आणि विकास कामांमुळे 30 एप्रिल 2026 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हिरडोशी ते वरंधा घाट दरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे.

    25 मार्च-1 एप्रिल मार्ग बंद

    जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार 25 मार्चपासून या मार्गावर ‘नो एंट्री’ लागू करण्यात आली असून जड तसेच हलक्या वाहनांच्या वाहतुकीवर पूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत. घाटातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून, या कालावधीत वाहनांची ये-जा धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याची मजबुती, दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक उपाययोजना जलदगतीने पूर्ण करण्यासाठी हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. भोर पोलीस प्रशासनानेही वाहतूक नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त ठेवला असून, नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Maharashtra TimesMumbai Local: लोकल, मेल-एक्सप्रेस खोळंबणार नाहीत! रेल्वे फाटक बंद करून पूल व बोगदे बनवणार; कल्याण-लोणावळा मार्गावर 10 उड्डाणपूल

    दरम्यान, वाहनधारकांनी वरंधा घाटाचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पुणे-कोकण प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागणार असला, तरी भविष्यात अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी ही उपाययोजना आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. महिनाभर घाटातील प्रवास ठप्प राहणार असल्याने स्थानिक व्यावसायिक, पर्यटक आणि वाहतूकदार यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरीही, कामे पूर्ण झाल्यानंतर वरंधा घाट मार्ग अधिक सुरक्षित, रुंद आणि प्रवासयोग्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra TimesPune Accident: भरधाव टँकरची दुचाकीला धडक, पुतण्यासमोरच 94 वर्षीय चुलत्यांचा मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

    पर्यायी मार्ग कोणते?

    या काळात प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सर्वात सोयीस्कर ठरणारा मार्ग म्हणजे ताम्हिणी घाट (पुणे-मुळशी-माणगाव) पुण्याला कोकणाशी जोडणारा या मार्गावरून प्रवासाचा कालावधी काहीसा वाढत जरी असला तरी हा मार्ग सुरक्षित आहे. आणखी एक पर्यायी मार्ग पोलादवरून जातो. परंतु, या मार्गावरून प्रवासात 1 ते 2 तास वेळ वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रवासी हा मार्ग टाळतात.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा