• Sun. Jun 14th, 2026

    Sangli Politics : ‘जयंत पाटलांनी भाजपात जाण्यासाठी उंबरे झिजवले; आतल्या गोष्टी क्रमश: बाहेर काढणार’, संजयकाका पाटील यांचा इशारा

    Sangli Politics : ‘जयंत पाटलांनी भाजपात जाण्यासाठी उंबरे झिजवले; आतल्या गोष्टी क्रमश: बाहेर काढणार’, संजयकाका पाटील यांचा इशारा

    संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी केलेला दावा खरं आहे ते सांगावं, असं आव्हान संजयकाका पाटील यांनी केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतं जयंत पाटील यांना इशारा दिला आहे. भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार संजय पाटील आहे, असा दावा संजयकाका पाटील यांनी केला आहे. “जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहास काढायला भाग पडू नये”, असा इशारा संजयकाका पाटील यांनी दिला. आपल्याला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान देखील संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना दिले आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजयकाका पाटलांच्यावर टीका करताना, संजयकाका पाटील यांना आपणच भाजपसोबत पाठवलं होतं, असं विधान केले होतं. यावरून संजयकाका पाटलांनी जयंत पाटलांना हा इशारा दिला आहे.

    संजय काका पाटील काय म्हणाले?

    “सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं. संजय काकांना भाजपच्या बैठकीला आम्ही पाठवलं होतं आणि ते आम्हाला माहिती देत होते, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. पण जयंत पाटील यांना माझं सांगणं आहे की, मी तुम्हाला आयुष्यात कधी माझा नेता मानला नाही आणि मानायची वेळही येणार नाही. पण तुम्ही पोरकटपणाने जे वक्तव्य केलं आहे, जिल्ह्यामधील माणसं राजकारण जवळून पाहतात. तुम्ही कितीवेळा भाजपमध्ये येण्यासाठी उंबरे झिझवले त्याचा संजय पाटील देखील साक्षीदार आहे”, असं संजयकाका पाटील म्हणाले.

    ‘मला क्रमश: काही गोष्टी काढाव्या लागतील’

    “तुम्ही कुणाकुणाशी बोलता, कसं अंडस्टॅडिंगचे राजकारण खेळता, आपल्या तालुक्यातच तुमचं कसं राजकारण आहे, एकाच गावातले दोन गट एकमेकांच्या विरोधात लढवायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची या सगळ्या बाबी आणि आपला इतिहास मला काढायला लावू नका. तुम्ही तुमच्या इथून दोन माणसं, संजय पाटील चार माणसं बरोबर घेऊन आला, त्याचा राग म्हणून तुम्ही माझ्याशी भांडायला पाहिजे होतं. पण तुम्ही काहीतरी कुचके राजकारण करण्याची भूमिका दाखवली आहे. यापुढे हे थांबलं नाही तर मला क्रमश: काही गोष्टी काढाव्या लागतील. एवढाच माझा तुम्हाला इशारा आहे”, असा मोठा इशारा संजयकाका पाटील यांनी दिला.

    “आमची अडचण करावी हाच त्यांचा हेतू होता. माझ्यासारखा माणूस एकाकी पडला होता. मी लढलो. मला साथ दिली. नगरपालिका, नगरपंचायत आली, बहुमत आणले. लोकांनी मला दिलेली शक्ती आहे. त्यामुळे मला असं दिवसा वेगळं आणि रात्री वेगळं, अंडरस्टँडिगचे राजकारण करावं, हे मी कधी केलं नाही. तुम्ही माझ्यावर आक्षेप घेताय. माझ्या राजकारणावर अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. लोक शहाणे असतात. लोक ओळखतात. पण तुम्हाला मी या निमित्ताने इशारा देतोय”, असाही इशारा संजयकाका पाटील यांनी दिला.

    ‘जयंत पाटलांचं वक्तव्य चुकीचं’

    “मी मागणी केली होती की, आम्हाला आमच्या अजित दादा गटाला अध्यक्ष पद द्या. अजित दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे अजित दादांच्या राष्ट्रवादीला अध्यक्षपद दिलं तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. पण आदल्यादिवशी ही प्रक्रिया झाली. तिथून आम्ही उठून आलो. यानंतर मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिणींचा फोन आला. असं करु नका, आपल्याला महायुती म्हणून निर्णय घ्यायचा आहे, असं आवाहन त्यांनी केलं. अडचणीच्या काळात जो माणूस मदतीला येतो तो खरा मित्र असतो. त्यामुळे मी निर्णय घेतला. मला माहिती आहे. माझ्यासोबत दोन जण आले. बाकीचे आता आले नाहीत. त्यांचं काय बोलणं झालं, तो विषय मला घ्यायचा नाही. मला कुणाचे नुकसान करायचं नाही. पण ज्या पद्धतीने जयंत पाटलांनी वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं आहे”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

    “इथे वर्चस्व संपवण्याचा शंभर टक्के प्रयत्न आहे. पुढचं आज बोलत नाही. जयंत पाटलांनी मुलगा प्रतीक पाटील यांच्या डोक्यावर हात ठेवावा आणि संजय पाटलांनी आपल्याला मदत केली हे सांगावं. खोटं बोलून कुचकं राजकारण करत आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा