• Tue. Mar 17th, 2026

    Mumbai Water Tax: पाणीपट्टीत वाढ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव, मुंबईकरांचे पाणी महागण्याची शक्यता; 8 टक्क्यांची वाढ होणार

    Mumbai Water Tax: पाणीपट्टीत वाढ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव, मुंबईकरांचे पाणी महागण्याची शक्यता; 8 टक्क्यांची वाढ होणार

    Water Tax Hike: मुंबईत गेली चार वर्ष पाणीपट्टीत वाढ झाली नाही आहे. आता महापालिकेने तब्बत आठ टक्क्यांची वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे मुंबईकरांचे पाणी महागणार आहे.

    सुशांत मोरे, मुंबई: मुंबई महापालिकेने पाणीपट्टीत आठ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच पालिका आयुक्तांकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर स्थायी समितीसमोर ठेवला जाईल. पाणीपुरवठ्याचा वाढता खर्च आणि २०२० पासून पाणीपट्टीत वाढ न झाल्याने होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीमुळे महापालिकेला होणारे संभाव्य १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान टाळता येईल.

    मुंबई महापालिकेला पाणीपट्टीतून दरवर्षी २,३०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, पाणीपुरवठ्यासाठी लागणारा खर्च, जसे की पाइपलाइनची देखभाल, पाणी शुद्धीकरण, आस्थापना खर्च, राज्य सरकारला द्यावी लागणारी रॉयल्टी आणि विद्युत खर्च, यांमुळे महापालिकेवर आर्थिक ताण येत आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले होते आणि त्यानंतर २०२२ पर्यंत पाणीपट्टीत वाढ झाली नव्हती. त्यामुळे महापालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

    Maharashtra TimesMumbai AC Local: मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवी एसी लोकल, दररोज 100 फेऱ्या सुरू होणार; उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा

    महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पाणीपट्टीवाढीला स्थगिती देण्याचे जाहीर केले होते. मात्र, पाणीपुरवठ्याचा वाढता खर्च पाहता हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे समजते. या आठ टक्के वाढीमुळे महापालिकेला होणारे संभाव्य १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान टाळता येईल खर्च होतो. त्यामुळे हा भुर्दंड सहन कसा करणार, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. त्यामुळे पाणीपट्टीत आठ टक्के वाढ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव लवकरच मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापौर रितू तावडे यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम पाणीपट्टीवाढीला स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र, आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४,४७, ३६३ दशलक्ष लिटर आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट, मुंबईत गुढीपाडव्याला हलक्या सरींची शक्यता; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’

    चार वर्षांनंतर प्रथमच

    मुंबईकरांना सात धरणांतून महापालिका दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. पाणीपुरवठ्यासाठी मोठा खर्च येत असल्याने दरवर्षी जून महिन्यात पाणीपट्टीत आठ टक्के वाढ केली जाते. मात्र, पाणीपट्टीवाढीला होणारा विरोध पाहता २०२२पासून मुंबई महापालिकेने वाढ केलेली नाही. मुंबई महापालिका २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांत १६ जूनपासून मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ करण्याच्या विचारात होती. मात्र, त्यास पक्षांनी विरोध केला होता.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा