• Wed. Jun 17th, 2026
    Pune Crime : ‘मला कट का मारलास?’, तरुणाचा पाठलाग करत जाब विचारला; महिलेने जीवघेणा हल्ला केला, तिघांवर गुन्हा

    पुण्यातील कोंढवा परिसरात दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला. एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल. भाग्योदयनगर भागातील धक्कादायक घटना.

    पुण्यातील कोंढवा भागात किरकोळ वादातून तरुणाव जीवघेणा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेला वाद जीवघेण्या हल्ल्यात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलांनी आणि एका महिलेने तरुणाला अडवून त्याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना भाग्योदयनगर परिसरात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू असून, या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाणे येथे महिलेसह तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेमकं काय घडलं?

    “गाडीला कट का मारला?” म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील भाग्योदयनगरमध्ये शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. तरुण मक्का ओम सोसायटीजवळ दुचाकीवरून जात होता. अचानक त्या तरुणाचा आणि दुसऱ्या गटाचा वाद सुरु झाला. कारण काय? तर त्याच्या गाडीला कट मारला होता. वाद सुरुवातीला साधा वाटला, पण अचानक संतापलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी आणि एका महिलेनं तरुणाला थांबवलं.
    त्यानंतर वादाचे रूपांतर हळूहळू हाणामारीत झालं. हाणामारी थरारक रूपात बदलली आणि आरोपींनी तरुणाच्या थेट डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. लोकांचं लक्ष वेधून घेणारं म्हणजे हा वाद साधा कटचा होता, पण आता जीवघेणा हल्ल्यात रूपांतरित झाला.

    Maharashtra TimesJalgaon Crime : आजाराने मृत्यू, कागदावर मात्र अपघात; 50 लाखांच्या विम्यासाठी डॉक्टर-पोलीसांनीच रचला कट, 10 जणांवर गुन्हा

    तरुण गंभीर जखमी

    या धक्कादायक घटनेनंतर तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोपी सध्या फरार असून पोलिसांनी महिलेसह मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक खोपडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपी महिलेचा आणि मुलांचा शोध घेण्यासाठी कोंढवा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

    Maharashtra TimesMumbai Airport: 400 मीटरसाठी 18000 रुपये! मुंबई विमानतळावर टॅक्सी-रिक्षाचालकांची दादागिरी; पोलिसांच्या कारवाईत 80 गुन्हे दाखल

    मात्र या घटनेनंतर कोंढावा परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पशा कारणावरून केलेला वाद टोकाला गेल्यामुळे तो एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो हे पाहून नागरिकांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे, रस्त्यावर कोणताही तणाव न वाढवणे, आणि हिंसक परिस्थिती उद्भवल्यास लगेच पोलीस संपर्कात राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा