• Mon. Mar 9th, 2026
    Devendra Fadnavis: ‘लाडक्या बहिणीं’ना उद्योजिका करणार; जागतिक महिलादिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

    महाराष्ट्र टाइम्स

    Devendra Fadnavis: केवळ अनुदानावर अवलंबून न ठेवता त्यांना उद्योजक करण्याच्या उद्देशाने ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.

    लाडक्या बहिणी उद्योजिका होणार, मुख्यमंत्री(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : ‘लाडकी बहीण योजने’च्या अनुदानातून कर्जाचे हप्ते भरण्याच्या बदल्यात मुंबई बँकेकडून महिलांना बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे. याच धर्तीवर राज्यभरातील महिलांना आता व्यवसायात गुंतवणूक करून त्यातून त्यांनी नफा कमवण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

    जागतिक महिला दिन आणि पहिल्या महिला विधिमंडळ सदस्य मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दीनिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून भाईंदरच्या उत्तन येथे राज्यभरातील ग्रामीण महिलांच्या स्वयंपूर्ण सक्षमीकरणासाठी ‘ विकास भारत नारीशक्ती संगम ’ या नावाने दोनदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आदी या वेळी उपस्थित होते.

    Maharashtra TimesLPG Price Hike: कुटुंबाचे बजेट ‘गॅस’वर; ऐन उन्हाळ्यात सिलिंडरच्या दरवाढीचा ताप, हॉटेल व्यावसायिकही चिंतेत
    ‘महापालिकांमध्ये ९० टक्के, तर जिल्हा परिषदांमध्ये ७० टक्के महिला स्वतःच्या बळावर निवडून येतात. ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ६० टक्के सरपंच महिला स्वतःच्या बळावर काम पाहत आहेत. येत्या काळात आपल्याला ‘सरपंच पती’ या पदाचे पूर्णपणे उच्चाटन झालेले पाहायला मिळेल. मी सरपंच पती आहे, असे कोणी म्हणणार नाही,’ असे मत व्यक्त करून त्यांनी महिलांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

    लाडकी बहिण योजनेचं नाव सांगून कागदपत्रं मागितली, शिंदेंनी वाघमारेंच्या उमेदवारीचा किस्सा सांगितला

    ‘… त्यानंतर महिलाकेंद्रित लोकशाहीकडे वाटचाल’
    बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरू झालेला हा प्रवास आता ‘लखपती दीदी’पर्यंत आलेला आहे. ‘हर घर जल व हर घर गॅस’ व इतर योजनांचा केंद्रबिंदू महिला आहेत. २०२९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ३३ टक्के महिला खासदार निवडून जाणार आहेत. त्यानंतर देशाची वाटचाल महिलाकेंद्रित लोकशाहीच्या दिशेने होईल,’ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.