कल्याण-डोंबिवलीत विजेचा धक्का लागून दोन वेगवेगळ्या घटनांत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काटई येथील बिर्याणी दुकानात आणि आधारवाडीत पाण्याचा पंप सुरू करताना या दुर्घटना घडल्या आहेत.
बिर्याणी दुकानातील बाकावर…
अजयकुमार गौतम हा मूळचा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील मल्लीपूर तालुक्यातील बाबुपुरा गावचा रहिवासी होता. तो गेल्या एक महिन्यापासून कल्याण-शिळ महामार्गावरील काटई येथील ‘ताज बिर्याणी’ दुकानात काम करत होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुकानातील काम आटोपल्यानंतर अजयकुमार जेवण करून हात धुवायला गेला. हात ओले असतानाच त्याने दुकानात उभ्या असलेल्या एका लोखंडी बाकावर वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या लोखंडी बाकात वीज प्रवाह उतरलेला असल्याने अजयकुमारला जोराचा धक्का बसला आणि तो दूर फेकला जाऊन बेशुद्ध पडला.इतर कामगारांनी मालकाच्या मदतीने त्याला तातडीने डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायद्यान्वये नोंद करण्यात आली असून कुटुंबीयांनी मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचे पोलिसांना कळवले आहे.
Gondia News: रंगपंचमीचा आनंद ठरला शेवटचा, तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा करुण अंत; गोंदियावर शोककळा
पाणी खेचण्याच्या पंपाचा धक्का लागल्याने दुसरी दुर्घटना
दुसरी घटना कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. संदीप रावत हा उत्तर प्रदेशातील होरीलाल गावचा रहिवासी असून तो आधारवाडी कारागृहासमोरील भानुदास गायकर चाळीत राहत होता. घराशेजारी पाण्याचा पंप सुरू असताना संदीप तेथे हात-पाय धुण्यास गेला. अचानक पंपातून विजेचा प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा धक्का बसला आणि तो जागीच बेशुद्ध पडला.
Chhagan Bhujbal : ‘अजितदादांचं विमान झाडावर आदळल्याचं आश्चर्य वाटलं’; तपासातील झाडाच्या थेअरीवर छगन भुजबळांना शंका
नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी त्याला तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात खडकपाडा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.
