खड्डेमय रस्ते, वाहतूक शिस्त नसल्याने वारंवार कोंडी होत याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.आता या गंभीर समस्येचा फटका आता सुप्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांना ही बसला. नांदेडमध्ये आयोजित कुसुम महोत्सवासाठी आलेल्या गायक कैलाश खेर यांना या समस्येचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरच रस्त्यांच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत वाभाडे काढले.