विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (२३ फेब्रु.) सुरुवात होत आहे.दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे.राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेही हे पहिलेच अधिवेशन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले. अनेक अनुषंगाने यंदाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे.