किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडला.मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिवंगत नेते अजित पवार यांची आठवण काढली.शिवनेरीवर आमच्या अजितदादांचं प्रचंड प्रेम होतं, अशी आठवणी फडणवीसांनी सांगितली.पुण्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त करण्यात आल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.