• Sat. Mar 7th, 2026

    Maharashtra Weather 18 February: फेब्रुवारीतच बसत आहेत उन्हाचे चटके, पुण्यातील किमान तापमान 18 अंशावर; पहाटेची थंडीही गायब

    Maharashtra Weather 18 February: फेब्रुवारीतच बसत आहेत उन्हाचे चटके, पुण्यातील किमान तापमान 18 अंशावर; पहाटेची थंडीही गायब

    Pune Weather 18 February 2026: पुण्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहेत. रात्री आणि पहाटेच्या तापमानातही वाढ झाली असून सरासरीपेक्षा 5.5 अंश सेल्सिअस जास्त नोंदवलं गेलं आहे. पुढील दोन दिवस कसं राहील हवामान?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: शहरात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या चटक्यांचा अनुभव पुणेकर घेत असतानाच, आता रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. शिवाजीनगर येथे सोमवारी १४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. यामध्ये मंगळवारी चार अंश सेल्सिअसने वाढ होऊन किमान तापमान १८.४ अंशांवर पोहोचले होते.

    फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उन्हाळ्याची चाहूल

    शहरासह आसपासच्या परिसरांत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभर ऊन, तर रात्री आणि पहाटे गारवा असे संमिश्र वातावरण पुणेकर अनुभवत होते. मात्र, मंगळवारी किमान तापमानात वाढ झाली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार हे तापमान सरासरीपेक्षा ५.५ अंशांनी जास्त होते. दहा वर्षांत फेब्रुवारी महिन्यात सन २०१६मध्ये १९.५, सन २०१९मध्ये १९.२ आणि सन २०२४ मध्ये १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. यंदा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच किमान तापमानाने १८ अंशांचा टप्पा ओलांडला असल्याचे चित्र आहे.Maharashtra TimesST Bus: स्वारगेट बस स्थानाकत महिलेवर अत्याचार, एका वर्षानंतर महामंडळाला आली जाग; आता 7000 सीसीटीव्ही बसवणार; कुठे?

    पुढील दोन दिवस कसं असेल तापमान?

    भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, मंगळवारी शहरात शिवाजीनगर येथे ३३.५ अंश सेल्सिअस कमाल आणि १८.४ अंश सेल्सिअस किमान तापमान, लोहगाव येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल आणि २१.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमान ३३-३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६ अंश सेल्सिअस दरम्यान असेल, असा अंदाज विभागाने वर्तविला आहे.

    ‘फेब्रुवारी महिन्यात कमाल आणि किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने बदल होणे सामान्य आहे. हवेतील आर्द्रता सध्या वाढली असून, सोमवारी रात्री काहीसे ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम मंगळवारी किमान तापमानावर झाला होता’, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचा वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांनी दिली आहे.

    Maharashtra TimesMumbai-Pune Expressway: ‘पुणे-मुंबई एक्सप्रेसवे’वर कोंडीतही टोल वसुली, MSRDC करणार पूर्ण रक्कम परत; कधी-कशी मिळणार?

    नाशिमध्ये थंडी गायब

    नाशिकमध्ये थंडी गायब झाली असून तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे नाशिककरांना आता थंडीचा अनुभव येत नाहीये. वातावरणातील गारवा कमी झाला असून, कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी तर हे तापमान ३१.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. किमान तापमानातही वाढ झाली असून, ते १५.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे पहाटे जाणवणारा गारठाही आता कमी झाला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा