• Mon. Jun 15th, 2026
    Ahilyanagar Crime : पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे घुसून गोळीबार, 33 वर्षीय तरुणाला संपवलं; अहिल्यानगरमधील घटनेचा CCTV

    Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील घोडेगावात भीषण टोळीयुद्ध! पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबारात 33 वर्षीय नितीन शिरसाठचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

    घोडेगाव गोळीबार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घोडेगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या भीषण टोळी युद्धाने परिसर हादरला आहे. पूर्ववैमनस्यातून पेटलेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले आणि यात नितीन विलास शिरसाठ (वय 33) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या गटातील सुरज फुलमाळी (वय 23) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन्ही गटांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर गावठी कट्ट्यांमधून गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात नितीन शिरसाठ याचा मृत्यू झाला, तर सुरज फुलमाळी गंभीर जखमी अवस्थेत कोसळला. आता या गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडिओ दिसतंय की, नेमकी घटना काय घडलीय.

    रुग्णालय परिसरातही दोन्ही गट पुन्हा आमनेसामने

    जखमी आणि मयत दोघांनाही तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालय परिसरातही दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाले रुग्णालयातच हाणामारी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमागे पूर्वीपासून सुरू असलेले वैमनस्य कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत झालेली ही दुसरी गोळीबाराची घटना असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

    Maharashtra TimesNandurbar Crime : घोर कलियुग! 17 वर्षाच्या मुलीची प्रसुती, नऊ महिन्यांनी समजलं की, घरातले शेतात गेल्यावर… महाराष्ट्र हादरवणारी घटना

    बेकायदेशीर शस्त्र गावात येतात कुठून?

    दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गावठी कट्टे आणि पिस्तुलांचा सर्रास वापर चिंतेचा विषय ठरत आहे. हे बेकायदेशीर शस्त्र गावात येतात कुठून? त्यावर कारवाई का होत नाही? बेकायदेशिर शस्त्रांचा पुरवठा कोण करतं?, असे सवाल आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा