• Mon. Mar 9th, 2026

    Narhari Zirwal: … तर मी राजीनामा देणार; मंत्रालयातील लाच प्रकरणाने खळबळ उडताच नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य

    Narhari Zirwal: … तर मी राजीनामा देणार; मंत्रालयातील लाच प्रकरणाने खळबळ उडताच नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य

    नवी दिल्ली: लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुरुवारी मुंबईत केलेल्या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे. कारण एसीबीच्या कारवाईत गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या क्लार्कला अटक करण्यात आली. राजेंद्र ढेरंगे असे या क्लार्कचे नाव असून 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला पकडण्यात आलं. मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली. ज्या खात्यातील क्लार्कवर ही कारवाई करण्यात आली त्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री Narhari Zirwal हे या घटनेमुळे अडचणीत आले असून आज त्यांनी याप्रकरणी आपली बाजू मांडत लाच घेणाऱ्या क्लार्कवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं आहे.

    तुमच्या मंत्र्यालयातील हा क्लार्क होता, तर ही जबाबदारी तुमच्यावरही येत नाही का? असा प्रश्न आज नवी दिल्ली इथं पत्रकारांकडून मंत्री नरहरी झिरवळ यांना विचारण्यात आला. त्यावर झिरवळ म्हणाले की, “ही जबाबदारी आहेच, नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केलंय, त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही, हे मी खात्रीने तुम्हाला सांगतो. या प्रकरणाची चौकशी व्हावी. चौकशीत जर या लाच प्रकरणाची लिंक माझ्यापर्यंत जोडली गेली, तर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देईन,” असं झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे.

    “मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार”

    “जो गैरप्रकार झालाय, त्याला आपण कसल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही. जी शासकीय किंवा कायदेशीर बाब असेल त्याचा त्याला जाब द्यावा लागेल. कारकून म्हणून त्याचं कार्यालय बाहेर होतं. मंत्री किंवा मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी यांच्याशी त्याच्या तसा थेट संबंध नाही. माझं कार्यालय सील केल्याची माहिती मला तुमच्याकडूनच मिळत आहे. पण मला असं वाटत नाही की मंत्रालयातील माझं कार्यालय सील केलं गेलं असावं. मी आज दिल्लीवरून मुंबईला जाणार आहे. मुंबईतगेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन आणि या सर्व प्रकरणाविषयी त्यांच्यासोबत चर्चा करेन,” असं म्हणत Narhari Zirwal यांनी लाच प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे.

    मंत्रालयात नेमकं काय घडलं?

    एका तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला होता. त्याचा औषधांच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. ही निलंबन कारवाई रद्द करण्यासाठी राजेंद्र ढेरंगे या मंत्रालयातील क्लार्कने 50 हजार रुपये लाच मागितली होती. याबाबतची तक्रार प्राप्त होताच एसीबीने पडताळणीनंतर सापळा रचला, त्यात ढेरंगे सापडले. त्यांचे कार्यालय आणि निवासस्थानी एसीबीकडून शोधाशोध सुरू आहे. ढेरंगे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed