Maharashtra Mumbai Weather : राज्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम राज्यातही दिसू शकतो. त्यामुळेच राज्यातील हवामान ढगाळ, पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही हवामान ढगाळ असेल. ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी वाढ झाली, मात्र पावसामुळे तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडी काही प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज हवामान केंद्राने वर्तवला आहे. पाऊस झाल्यानंतर मात्र आकाश निरभ्र झाल्यावर पुन्हा तापमान वाढण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather : पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ, शेतकऱ्यांना हवामान खात्याचा सल्ला
मागील आठवड्यात जळगाव, नाशिक आणि राज्यातील इतर काही भागात अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसासह गारपीट झाली. गारपीटमुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आता पाऊस गेल्यानंतर अवकाळी आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर्व नुकसानग्रस्त क्षेत्रात, नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष पंचनामे सुरू करण्यात आले असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच शेतीच्या नुकसानीबाबत शेवटचा संपूर्ण माहिती समोर येईल.
धुळ्यात अवकाळी पाऊस, आमदार काशीराम पावरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली
मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली
दरम्यान, मुंबईत AQI अर्थात हवेची गुणवत्ता घसरली असून ता खराब श्रेणीत आली आहे. अशा हवेत श्वसनासंबंधी त्रास होऊ शकतो. तसंच डोळे आणि घशात जळजळ होण्यासारखे समस्या येऊ शकतात. वाहनांमधून निघणारा धूर, उत्सर्जनामुळे तसंच इमारतीची बांधकामं यामुळे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावते आहे.
