• Fri. Mar 6th, 2026
    Maharashtra Weather : पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, हवामान खात्याची माहिती; कुठे-कसं असेल तापमान?

    Maharashtra Mumbai Weather : राज्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्यातील हवामानात सतत चढ-उतार होत आहेत. हिवाळा सुरू असताना राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तर अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा, गारपीट झाल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

    ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम राज्यातही दिसू शकतो. त्यामुळेच राज्यातील हवामान ढगाळ, पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही हवामान ढगाळ असेल. ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी वाढ झाली, मात्र पावसामुळे तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडी काही प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज हवामान केंद्राने वर्तवला आहे. पाऊस झाल्यानंतर मात्र आकाश निरभ्र झाल्यावर पुन्हा तापमान वाढण्याचा अंदाज आहे.
    Maharashtra TimesMaharashtra Weather : पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ, शेतकऱ्यांना हवामान खात्याचा सल्ला
    मागील आठवड्यात जळगाव, नाशिक आणि राज्यातील इतर काही भागात अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसासह गारपीट झाली. गारपीटमुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आता पाऊस गेल्यानंतर अवकाळी आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर्व नुकसानग्रस्त क्षेत्रात, नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष पंचनामे सुरू करण्यात आले असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच शेतीच्या नुकसानीबाबत शेवटचा संपूर्ण माहिती समोर येईल.

    धुळ्यात अवकाळी पाऊस, आमदार काशीराम पावरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली

    मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली

    दरम्यान, मुंबईत AQI अर्थात हवेची गुणवत्ता घसरली असून ता खराब श्रेणीत आली आहे. अशा हवेत श्वसनासंबंधी त्रास होऊ शकतो. तसंच डोळे आणि घशात जळजळ होण्यासारखे समस्या येऊ शकतात. वाहनांमधून निघणारा धूर, उत्सर्जनामुळे तसंच इमारतीची बांधकामं यामुळे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावते आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा