Chandrapur Congress Threat News: गुरुवारी पहाटेच्या या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील महापालिकेचे राजकारणात खळबळ उडाली आहे.
गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ट्रॅव्हल्स अडवित धमकावण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या घटनेने ट्रॅव्हल्समधील सारेच नगरसेवक घाबरले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी वर्धा पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वर्ध्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सावंगी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत कनेन सिद्धीकी रा. चंद्रपूर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर मुज्जमील खान रा. नागपूर, सौरभ ठोंबरे रा. चंद्रपूर, जाशीम खान रा. नागपूर, अलोक रोहिदास आणि अदनान शेख या साथीदारांची माहिती दिली. या आधारावर सावंगी पोलिसांनी कलम १२६, १८९, ३५१, ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक पळविण्याचा प्रयत्न नेमका कुणी केला, याविषयीची चर्चा वाढली आहे.
Ankush Kakade: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात हीच दादांची इच्छा होती, पण…; अंकुश काकडेंचा दावा
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते कुणाल चौधरी यांच्याशी वडेट्टीवार यांच्यासोबत नागपुरातील एका हॉटेलमध्ये दीर्घ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेत्यांच्या दावेदारीने वाद
चंद्रपूर महापालिकेतील ६६ सदस्यांमध्ये काँग्रेसचे २७, भाजप २३, शिवसेना (उबाठा) सहा, भारतीय शेतकरी कामगार पक्ष तीन, बसप एक, एमआयएम एक, शिवसेना एक, वंचित बहुजन आघाडी दोन, अपक्ष दोन नगरसेवक निवडून आले आहेत. कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असले तरी वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोन नेत्यांच्या गटांमध्ये विभागले गेले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. शिवसेना (उबाठा) किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने त्यांच्याकडून महापौरपदाची मागणी केली जात आहे. अडीच वर्षांचे सूत्र काँग्रेससोबत चर्चेला आल्याचेही सांगण्यात येत होते.
Chandrapur Mayor : अवघ्या 6 जागा जिंकूनही चंद्रपुरात ठाकरेंचाच महापौर बसणार? 10 नगरसेवक मुंबईला रवाना, पडद्यामागे मोठ्या घडामोडी
चार दिवसांपूर्वी काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या अनुषंगाने चर्चा केली होती. यानंतर काँग्रेसची सत्ता स्थापन होणार असा विश्वास व्यक्त होत असतानाच भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या. भाजप नेत्यांकडून काँग्रेसचा एक गट संपर्कात असल्याचा दावाही केला जात होता. हे सारे घडत असतानाच आता गुंडांच्या माध्यमातून नगरसेवक पळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे हे नगरसेवक नेमके कुणी पळविण्याचा प्रयत्न हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
