• Fri. Mar 6th, 2026
    Amol Mitkari: ‘अजितदादांची चप्पल चोरून आणली आणि घरात पूजा केली’;  योद्धा गेला, आता शस्त्रे म्यान केली, मिटकरींची भावूक प्रतिक्रिया

    Amol Mitkari breaks down remembering Ajit Dada: ‘आमचा योद्धाच गेला, आता कोणासोबत लढायचं?’; मिटकरींच्या त्या विधानाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले!

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अकोला: “अजितदादांमुळेच माझा राजकीय जन्म झाला. आज आमचा योद्धाच आम्हाला सोडून गेला, आता ही लढाई कोणासाठी लढायची? आम्ही आता आमची शस्त्रे टाकली आहेत,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाचे वृत्त समजताच मिटकरी यांना आपला शोक अनावर झाला.

    भाड्याच्या घरापासून आमदारकीपर्यंतचा प्रवास

    अजित पवारांनी सामान्य कार्यकर्त्याला कसं मोठं केलं, याची एक भावूक आठवण मिटकरींनी सांगितली. “सहा वर्षांपूर्वी मी भाड्याच्या घरात राहायचो. एके दिवशी दादांचा फोन आला आणि त्यांनी मला आमदार करण्याचं आश्वासन दिलं. माझ्याकडे कागदपत्रे नव्हती, तर दादांनी स्वतः वकील लावून ती तयार करून घेतली आणि मला आमदार केलं,” असे सांगताना मिटकरींच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

    जेव्हा मिटकरींनी चोरली ‘दादांची चप्पल’…

    आमदार झाल्यानंतर पाच वर्षांनी मिटकरींनी स्वतःचं घर बांधलं. वास्तुशांतीसाठी त्यांनी अजित पवारांना आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं, पण कामाच्या व्यस्ततेमुळे दादा येऊ शकले नाहीत. “दादा येऊ शकले नाहीत, म्हणून मी देवगिरी बंगल्यावर गेलो आणि कुणालाही न सांगता दादांची चप्पल चोरून आणली. त्या चपलेची मी माझ्या घरात पूजा केली,” ही आठवण सांगताना मिटकरी सुन्न झाले होते.

    Maharashtra TimesSanjay Raut: मोदी- फडणवीसांनी अजितदादांवरील 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप मागे घ्यावेत, हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल; संजय राऊतांची पोस्ट

    “आम्ही तलवारी म्यान केल्या”

    अजित पवारांच्या निधनाने पोरके झाल्याची भावना व्यक्त करताना मिटकरी म्हणाले, “आता ही राजकीय लढाई संपली आहे. ज्यांच्या बळावर आम्ही लढायचो, तो आमचा सेनापतीच आता राहिला नाही. त्यांनी भाजपसोबत युती केली असली, तरी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार त्यांनी कधीच सोडले नाहीत. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी लाखो माणसे आज अनाथ झाली आहेत.”

    अजित पवारांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला आहे, अशी भावना मिटकरींनी व्यक्त केली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा