Dahisar-Mira-Bhayandar Mumbai Metro Line 9 A : दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो 9 अ लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या मेट्रो लाईनचं काम आता जवळपास पूर्ण झालं असून पुढील आठवड्यात मेट्रो सुरू होऊ शकते.
2019 मध्ये मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात
मिरा-भाईंदरलगत असलेल्या मुंबईत रेल्वेने प्रवास करताना वाढलेली गर्दी, तसेच रस्तेमार्गावरील वाहतूककोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिकेद्वारे मिरा-भाईंदरला मुंबईशी जोडण्याची मागणी होत होती. त्यानुसार राज्य सरकारने 2018 मध्ये दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो 9 अ प्रकल्पाला मंजुरी दिली. 2019 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
Metro Line 2B : ‘मेट्रो लाईन 2B’वर ‘शून्य पूल’, मुंबईत पूर्व – पश्चिम जोडणारा 130 मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रीज नेमका कुठे?
98 टक्के काम मे 2025 पर्यंत पूर्ण, त्यानंतर सात महिने चाचण्या
दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशा दोन टप्प्यांत एमएमआरडीएकडून या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे 98 टक्के काम मे 2025 पर्यंत पूर्ण झाले होते. त्यानंतर मेट्रोची चाचणी मागील सात महिने सुरू होती. चाचणी पूर्ण झाल्यानंतर 1 ते 3 जानेवारीदरम्यान मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाच्या पथकाने अंतिम सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली. यात काही किरकोळ सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. त्या पूर्ण करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
Kalyan News : मलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन, आजपासून भाविकांच्या सेवेत; 2 तासाचं अंतर 10 मिनिटांत होणार
त्यामुळे चालू आठवड्याच्या अखेरीस सीएमआरएसकडून अंतिम सुरक्षा परवानगी मिळण्याची शक्यता एमएमआरडीएच्या सूत्रांनी वर्तवली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर पुढील महिन्यापासून मेट्रो सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.
पावसाच्या भीतीमुळं अख्खं मेट्रो स्टेशन ताडपत्रीनं झाकलं? BKCमधील प्रकार
मिरा-भाईंदरकरांना आता थेट अंधेरी गाठता येणार
मिरा-भाईंदरवासींना मेट्रो मार्गिकेद्वारे अंधेरीला जायचे झाल्यास आधी दहिसरला जावे लागते. यादरम्यान दहिसर टोलनाक्यावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. मेट्रो सुरू झाल्यानंतर मिरा-भाईंदरमधील काशिगाव, पांडुरंगवाडी आणि मिरागाव या तीन स्थानकांतून थेट अंधेरी गाठता येणार आहे.
