• Tue. Mar 10th, 2026

    Eknath Shinde Politics: शिवसेनेचे नगरसेवक हॉटेलात बंद! सत्तास्थापनेपूर्वी एकनाथ शिंदेंची खबरदारी; कुणाकडे, किती संख्याबळ?

    Eknath Shinde Politics: शिवसेनेचे नगरसेवक हॉटेलात बंद! सत्तास्थापनेपूर्वी एकनाथ शिंदेंची खबरदारी; कुणाकडे, किती संख्याबळ?

    Eknath Shinde’s Corporators In Hotel Taj Land: विरोधक किंवा अन्य पक्षांकडून नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. राजकारणात कधीही काहीही घडू शकते. साहजिकच असे घडल्यास सत्तेचे समीकरण बिघडू शकते.

    shinde(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये जमण्याचे आदेश दिले. पुढचे तीन दिवस ते त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्येच मुक्कामी ठेवणार असल्याचे खात्रिलायकरित्या समजते. शिवसेनेच्या या निर्णयामुळे खरेच नगरसेवक फुटून पुन्हा नवा ट्विस्ट येणार का, या चर्चेला तोंड फुटले आहे.

    मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचे २९ उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. पण शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपची सत्ता मुंबई महापालिकेत येऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. साहजिकच अशा परिस्थितीत शिंदे यांची भूमिका निर्णायक असून त्यांच्या पाठिंब्याशिवाय भाजप मुंबईत सत्तेचा सोपान गाठू शकत नाही. साहजिकच शिंदे यांनी कोणतीही जोखीम पत्करायची नाही, असे ठरविल्याचे समजते.
    Maharashtra TimesMumbai Mega Block: मुंबईकरांचा खोळंबा! तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक
    एकनाथ शिंदे पूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. जोपर्यंत महापालिकेत सत्तेचा दावा केला जात नाही, तोपर्यंत नगरसेवकांना एकजूट ठेवणे गरजेचे असल्याचे शिंदे यांना वाटते. त्यामुळेच सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

    ‘पळवापळवी होणार नाही’
    एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या खबरदारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘पळवापळवी करण्याचे कोणतेही कारण नाही. सर्वकाही आता शांतपणे चालणार आहे. आम्ही सर्व निर्णय करणार आहोत, त्यामुळे पळवापळवीची शक्यता नाही.’
    Maharashtra Timesभोपळा शर्यत! अनोख्या स्पर्धेतून भाजप बाद; राष्ट्रवादी शप, मनसेत चुरस; पहिलं कोण? निकाल लागला
    कुणाकडे, किती संख्याबळ ?
    मुंबईत सत्ता स्थापनेसाठी ११४ नगरसेवकांचा पाठिंबा गरजेचा आहे. भाजपने ८९ जागा जिंकल्या आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेने २९ जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे शिंदे यांचे महत्त्व वाढले आहे. ठाकरे बंधू, शरद पवार यांची राष्ट्रवादी यांचा एकत्रित आकडा ७२ वर जातो. काँग्रेसला २४ जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे हा आकडा ९६ वर जातो. अशा स्थितीत काँग्रेसची विचारांशी जवळीक असलेले पक्ष जवळ आल्यास त्यांचा एकत्रित आकडा बहुमताच्या दिशेने पुढे सरकतो.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा