मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटाला लावलेली शाई लगेच पुसली (KDMC Voting Ink Wiped) जात असल्याचा आरोप कल्याण डोंबिवली महापालिकेतील उमेदवार उर्मिला तांबे यांनी केला आहे. केडीएमसी प्रभाग क्रमांक नऊमध्ये तांबेंसह काँग्रेस उमेदवार माधवी चौधरी यांनी तक्रार केली. हा काय प्रकार आहे? असे प्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला? असा संतप्त सवाल तांबे यांनी विचारला.
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मतदानासाठी बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जात असल्याचा दावा केला. मार्कर पेनने केलेल्या खुणेला सॅनिटायझर लावल्यावर शाई पुसली जात असल्याची तक्रार अनेकांनी केल्याचं राज ठाकरे म्हणाले.
BMC Election : दहा वाजता मतमोजणी, एका वेळी दोनच प्रभागांचं Counting, कोणकोणत्या उमेदवारांचे निकाल लांबणार?
महापौर आरक्षणाची पुन्हा सोडत
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर पद २०२१ साली काढलेल्या सोडतीनुसार खुल्या गटासाठी आरक्षित झाले होते. मात्र या सोडतीची मुदत २०२५ मध्ये संपल्याने महापौर पदाची सोडत पुन्हा काढली जाणार आहे. सोमवार, १९ जानेवारी रोजी महापौर पदासाठी ही सोडत होणार आहे. निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच कल्याण-डोंबिवलीत महापौर आमचाच यासाठी शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे.
Amit Satam | मुंबई निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची भावनिक साद; अमित साटम यांचे प्रत्युत्तर
निवडणुका युतीत लढवल्या जात असल्या, तरी मित्रपक्षापेक्षा आपल्या जागा जास्त निवडून याव्यात यासाठी दोन्ही पक्षांकडून कुरघोडीचे राजकारण करण्यात येत आहे. पालिकेत शिवसेना ६७ तर भाजप ५७ जागांवर लढत असल्याने सध्या तरी शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे. मात्र दुसरीकडे दोन्ही पक्षांचे प्रत्येकी १० पेक्षा जास्त बंडखोर रिंगणात आहेत. भाजपने आपल्या बंडखोरांना निलंबित केले असले, तरी शिवसेनेने मात्र बंडखोरावर कारवाई केली नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
BMC Election : बिनविरोध निवडणुकांबाबत हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, एकमेव उमेदवार उरला असेल तरीही…
अनेक बंडखोरांना तारण्याचे प्रयत्न त्या त्या पक्षाकडून सुरू असून या बंडखोरांच्या मागे ताकद उभी केली जात आहे. दरम्यान, महापौर पद खुल्या गटासाठी असल्याचे गृहीत धरून सत्ताधाऱ्यांकडून महापौर पदाचे संभावित चेहरे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र आता हे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महापौर पदासाठी आरक्षण सोडत ५ वर्षांसाठी असते. मागील निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. या सोडतीचा कालावधी संपल्याने आता पुन्हा सोडत काढली जाणार असून यासाठीची माहिती निवडणूक विभागाने घेतली आहे. १९ जानेवारी रोजी सोडत निघणार असून, या सोडतीत कोणत्या गटाला महापौर पदाची लॉटरी लागते याकडे आता निवडणुकीत विजयी होणाऱ्या नगरसेवकांचे लक्ष असणार आहे.
BMC Election मध्ये पाडु यंत्राचा वापर होणार? राज ठाकरेंची तीव्र नाराजी, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
यापूर्वी पडलेल्या आरक्षणाबाबतची माहिती महापालिका प्रशासनाकडून निवडणूक विभागाला धाडण्यात आल्याची माहिती पालिकेचे सचिव किशोर शेळके यांनी दिली. दरम्यान, महापौर पदाचे आरक्षण बदलणार असल्याने महापौरांच्या खुर्चीत बसण्यासाठी इच्छुक असलेल्यांची प्रतीक्षा वाढणार आहे. महापौर पदाचे आरक्षण काढल्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकाचा गट कोकण विभागीय आयुक्ताकडे नोंदणी केल्यानंतर महापौर पदाच्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापौर विराजमान होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
