Nashik News : डावे पक्ष, मनसे, काँग्रेस, उबाठा या विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत आंदोलनात सहभागी होऊन भाजपला बदनाम करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे
भाजपच्या विरोधात प्रतिक्रिया देणे, तपोवन येथील वृक्षतोडीसंदर्भात अनेकवेळा भाजपने खुलासे करूनही रोहन देशपांडे यांनी वेळोवेळी भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्या. भाजपच्या केंद्रीय व प्रदेश नेतृत्वाने एखाद्या विषयावर भूमिका घेतल्यानंतर देशपांडे सतत त्याविरोधात भूमिका घेत होते.
विशेषतः डावे पक्ष, मनसे, काँग्रेस, उबाठा या विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत आंदोलनात सहभागी होऊन भाजपला बदनाम करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे देशपांडे हे भाजपचे की भाजपविरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व करतात की काय? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ही कारवाई केली, असे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले.
म्हणून भाजप-शिवसेना पुण्यात स्वतंत्र
दुसरीकडे, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपसमवेत महायुतीसाठी प्रयत्न केले; परंतु त्यांची सर्वंकष सत्तेची महत्त्वाकांक्षा आणि इतरांना कमी लेखण्याच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेनेने हिंदुत्व विचारधारा आणि विकासाची भूमिका कायम ठेवून पुण्यात स्वतंत्र; तर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससमवेत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला,’ असे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी नमूद केले.
Uddhav Thackeray : लालबाग-परळ, शिवडीत ठाकरेंसाठी धोक्याची घंटा? बालेकिल्ल्यात उलटफेर, रविवारच्या सभेपूर्वी काय घडलं
सामंत यांनी प्रचाराच्या समारोपानंतर मतदारांना खुले पत्र लिहून भाजपच्या सत्ताकेंद्रित भूमिकेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. शिवसेनेच्या संयत प्रचाराला मतदारांना प्रतिसाद दिला असून, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची मदत घ्यावीच लागेल, असा विश्वासही त्यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.
Raju Patil : उमेदवारी मागे घेणारा मनसेचा शिलेदार भाजपात, मोठा मित्रही लवकरच धक्का देणार? राजू पाटलांकडे भाजपचे अप्रत्यक्ष बोट
पुणे महापालिका निवडणुकीत मतदारांना पैशांचे आमिष दाखवून उमेदवारांना धमक्या देऊन दबावाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी केला. मागील निवडणुकीत पैसे वाटप झालेल्या भागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या, तरी त्यांचे उद्योग दुसऱ्या ठिकाणी सुरूच असून, राज्य निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोळीवाड्यांचा क्लस्टर विकास केला तर मासे २२ व्या मजल्यावर सुकवणार का? Varun Sardesai यांचा सवाल
