• Sat. Mar 7th, 2026

    किती नगरसेवक फुटतील? एकनाथ शिंदेंचा फोन आलेला; निवडणुकीच्या रणधुमाळीत खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

    किती नगरसेवक फुटतील? एकनाथ शिंदेंचा फोन आलेला; निवडणुकीच्या रणधुमाळीत खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

    राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गौप्यस्फोट केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना जळगाव महापालिका निवडणुकीपूर्वी नगरसेवक फुटण्याबाबत विचारणा केली होती. खडसेंनी शिंदे यांना सांगितले की, पैशांच्या बदल्यात नगरसेवक फुटू शकतात आणि गुलाबराव पाटील यांना याबद्दल काहीही सांगू नका, असेही खडसे म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. नगरसेवक फुटतील का, किती नगरसेवक फुटू शकतात, अशी विचारणा करणारा कॉल एकनाथ शिंदे यांनी मला केला होता, असं खडसे यांनी एका सभेत सांगितलं. सोमवारी झालेल्या सभेत ते बोलत होते.

    शिंदे साहेबांचा मला फोन आला होता. जळगावात काय करायचं, अशी विचारणा त्यांनी केली. नगरसेवक फुटू शकतात का, असं एकनाथ शिंदे यांनी मला विचारलं. मी होकारार्थी उत्तर दिलं. त्यावर शिंदे यांनी किती नगरसेवक फुटू शकतात, असा प्रश्न केला. त्यावर २७, २८ ते ३० नगरसेवक फुटू शकतात, असं मी शिंदे यांनी सांगितलं. तुम्ही जितकी पाकिटं द्याल, तितके नगरसेवक फुटू शकतात, असं मी शिंदे यांना कॉलवर सांगितलं.
    Maharashtra Timesफ्रेंडली फाईट, वातावरण टाईट! शिंदेंच्या होमपीचवर राडा; भाजप उमेदवाराच्या पतीवर प्राणघातक हल्ला
    ‘इकडे बाजार भरलाय. साताऱ्यात एका ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. तसा जळगावात नगरसेवकांचा बाजार भरलाय, असं मी शिंदेंना सांगितलं. त्यांना पुढे इतकंच म्हटलं, कोणाला काही सांगू नका. गुलाबराव पाटील यांना तर अजिबात काही सांगू नका. त्यांचे आणि सुरेश दादा जैन यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे गुलाबरावांना काहीच सांगू नका, असं मी शिंदे यांना म्हणालो आणि हा किस्सा त्यांच्या माझ्यातच राहिला,’ असं खडसे यांनी सभेत सांगितलं. हा किस्सा गेल्या पंचवार्षिकचा असल्याचं खडसे म्हणाले.
    Maharashtra Timesअरे किती खोटं बोलाल? राज ठाकरेंनी भरसभेत फडणवीस, अन्नामलाईंचा VIDEOच दाखवला, पार्श्वसंगीतही खास
    २०१८ मध्ये जळगावमध्ये महापालिका निवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजप नं बाजी मारली. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपनं ७५ पैकी ५७ जागा जिंकल्या. त्यावेळी राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी असे मुद्दे तापलेले होते. पण जळगावात धक्कादायक निकाल लागला. भाजप पाठोपाठ शिवसेनेला १५ जागा मिळाल्या. तर एमआयएमनं ३ जागा जिंकल्या. जळगाव महापालिकेत तब्बल ४० वर्ष सुरेश जैन यांचं वर्चस्व होतं. त्या वर्चस्वाला भाजपन सुरुंग लावला आणि एकहाती सत्ता मिळवली. या पराजयानं सुरेश जैन राजकारणात बॅकफूटला गेले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा