नाशिक
पावसाळा सुरू झाला की बेडकं बाहेर यावीत तसे निवडणुका आल्या की ठाकरे बंधूंची भाषणे आणि नकला सुरू होतात. कितीही भाषणे केली तरी लोक त्यांना स्वीकारत नाहीत; कारण लोकांचा विश्वास भाजपवर आहे. या निवडणुकीत राज्यातील एकातरी मोठ्या महापालिकेत ठाकरे बंधू आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्ता आणून दाखवावी, असे आव्हान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दिले.
गेल्या सिंहस्थात नाशिकला सहा हजार कोटींचा निधी मिळाला होता. यंदा सुमारे ३० हजार कोटींची कामे होत आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची यंदा बरीच चर्चा झाली. यापुढे डांबरी रस्ते करायचेच नाहीत असा निर्णय सरकारने घेतला आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्ते काँक्रीटचे करण्यात येणार असून, पुढील २५-३० वर्षे त्यावर खड्डे पडणार नाहीत, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडून महाजनांचे कौतुक
आम्हाला येथील कुठली मोठी झाडे तोडायची नाहीत. काही झुडपे तोडायची आहेत. पण त्यासंदर्भातही उच्च न्यायालयात किस चालू आहे. उच्च न्यायालाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. मंत्री गिरीश महाजन न्यांची वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला. जवळपास २० हजार झाडे बाहेरून आणून त्यांचे रोपण केले जात असल्याने मुख्यमंत्र्यांनी महाजन यांचे कौतुक केले