Mumbai-Goa Highway Accident: रायगडमधील महाड तालुक्यात एक दुर्दैवी अपघात झाला आहे. एका भरधाव स्फिट गाडीने रस्त्याकडेला चालणाऱ्या भावंडांना भीषण धडक दिली आहे. या धडकेत बहिणीचा मृत्यू झाला असून ती केवळ 8 वर्षांची होती.
नेमकं काय घडलं?
ही घटना काल, शनिवार (10 जानेवारी 2026) रोजी दुपारी दीडच्या सुमारास महाड तालुक्यात घडली. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने आठ वर्षांच्या मुलीला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव शरण्या अक्षय दवंडे असून, ती इयत्ता दुसरीत शिकत होती. शाळकरी मुलीचा अशा दुर्दैवी अपघातात अंत झाल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
Raigad Accident: खासगी बसने ८ वर्षीय आरुषला चिरडलं; आईसमोरच पोराने जीव सोडला; घटनेनं शहरात हळहळ
अपघाताच्या वेळी शरण्या आणि तिचा भाऊ शिवम (वय 9) हे दोघे रस्त्याच्या कडेला पायी चालत होते. आरोपी चालक अतिवेगाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत होता. याच निष्काळजीपणामुळे पायी चालणाऱ्या या दोघांना कारने धडक दिली.
परिसरात तणाव
कार चालकाचे नाव फरहान अब्दुल कादिर ताजीर (रा. अप्पर तुडील, महाड, रायगड) असे असून, अपघातानंतर तो घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आजूबाजूला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्याला वेळीच पकडले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या अपघाताची बातमी गावभर पसरताच ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला. संतप्त ग्रामस्थांनी थेट महाड पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीला त्यांच्याकडे सुपुर्द करण्याची मागणी केली. यावेळी पोलिस ठाण्याला घेराव घालण्यात आला असून, बराच काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
Raigad Crime: बाप रे! ‘घोडे दाखवतो’ असं म्हणाला अन् जंगलात नेलं, चिमुरड्यासोबत भयानक कृत्य, विकृत नराधमाच्या मुसक्या आवळल्या…
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात तातडीने गुन्हा दाखल केला असून, घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
महेश लांडगेंसाठी गोपीचंद पडळकर धावले, अजितदादांपासून रोहित पवारांवर सडकून टीका
दरम्यान, ग्रामस्थांनी या अपघातासाठी प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. परिसरातील रहिवासी सांगतात की, या महामार्गावर वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे पालन केले जात नाही. अपघात रोखण्यासाठी CCTV कॅमेरे, सातत्याने पोलिस निरीक्षण आणि जनजागृती मोहिमा राबवण्याची नितांत गरज आहे.
