Maharashtra Weather Update Today : मुंबईसह राज्यातील अनेक भागात विदर्भ, मराठवाडा, नाशिकमध्येही थंडीचा कडाका कायम आहे. पुढील दोन दिवस थंडी कायम असेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
मुंबईसह कोकणात 17 ते 21 अंश सेल्सिअस, तर उर्वरित महाराष्ट्रात नऊ ते १२ अंश सेल्सिअसदरम्यान किमान तापमान जाणवेल. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे 8.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन दिवस सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बुलढाणा येथे 12 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक किमान तापमानाची नोंद होऊ शकते. रविवारनंतर मकरसंक्रांतीच्या, म्हणजे बुधवार 14 जानेवारीपर्यंतच्या पहाटे किमान तापमानात काहीशी वाढ होऊन थंडी कमी जाणवेल.
Mumbai News : मुंबईतील आणखी एका पुलाची दुरावस्था; तुटलेल्या पायऱ्या, कचऱ्याचा ढिग… धोकादायक स्थितीत शाळकरी मुलं, वृद्धांची ये-जा
… यामुळे थंडीत होणार घट
उत्तर भारतातील प्रत्यावर्ती चक्रीय वारा प्रणाली महाराष्ट्रावर सरकली असून, थंडी घेऊन येणाऱ्या थंड कोरड्या पूर्वीय वाऱ्यांना अडथळा झाला आहे. त्याऐवजी बंगालच्या उपसागरातील आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्रात फेकले जात आहेत. मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांत वारे उलट दिशेने म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काहीशी थंडी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रणालीतील बदलानुसार मकरसंक्रांतीनंतरच थंडी येऊ शकते, असा अंदाज आहे.
Maharashtra Weather : मुंबईत ढगाळ वातावरण, तर राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज; पुढील 7 दिवस कसं असेल हवामान?
भोगीच्या दिवशी ढगाळ वातावरण
भोगीला मंगळवार 13 जानेवारीच्या आधी खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवते. तर पुणे, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही नाकारता येत नाही, अशी माहिती हवामान विभागातील निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
Latur Farmer | खांद्यावर नांगर घेतल्याशिवाय सरकार कर्ज माफ करत नाही, शेतकऱ्याची विधानभवन दिंडी
दरम्यान, नागपूरसह विदर्भातील अनेक शहरांमध्ये थंडीचा कडाका अद्याप कमी झालेला नाही. शनिवारीच्या तुलनेत रविवारी तापमानात किंचित वाढ झाली असली तरी पुन्हा घसरण होत नागपूरचा पारा १०.४ अंशांवर आला आहे. तसंच नाशिकमध्येही थंडीचा जोर कायम आहे. शेकोट्या पेटवून, तसंच उबदार कपडे परिधान करून नागरिक थंडीपासून बचाव करत आहे. सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद होणाऱ्या निफाडचा पारा 6.7 अंशावर आल्याने थंडीचा जोर वाढला आहे.
