• Sun. Mar 8th, 2026
    Nagpur Election: …तर घरावर बुलडोजर चालणार; असदुद्दीन ओवैसींनी मुस्लिम समुदायाला केलं अलर्ट, असं का म्हणाले?

    AIMIM Leader Asaduddin Owaisi: ओवैसी यांची दिघोरी येथील मोठा ताजबाग येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी एमआयएमद्वारे महापालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

    owaisi(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: प्रत्येक समाजाचे-धर्माचे स्वत:चे राजकीय प्रतिनिधित्व आहे. मात्र, मुस्लिम समुदाय केवळ मतदार होऊन राहिला आहे. यापुढेही तुम्ही केवळ मतदार बनून राहाल तर तुमच्या घरावर बुलडोजर चालणार हे निश्चित आहे’, असे वक्तव्य एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी केले.

    मुस्लिमाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर बोलतान ते म्हणाले, ‘भारत आणि महाराष्ट्रात प्रत्येक धर्माचे राजकीय प्रतिनिधित्व आहे. पण, मुस्लिमांचे नाही. ही निवडणूक आपल्या धर्माचे राजकीय नेतृत्व उभे करण्याची चांगली संधी आहे. केवळ मतदार बनून राहाल तर तुमच्या घरावर बुलडोजर चालणार, मुस्लिम युवकांवर खोटे आरोप लावून तुरुंगात डांबले जाईल, शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येईल तसेच तुम्हाला कधीही सन्मान मिळणार नाही. मुस्लिमांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्या जात असून त्यांना आपल्या जीवनाची कुठलीही किंमत यांना नाही. त्यामुळे स्वत:चे राजकीय प्रतिनिधित्व उभे करा. आपल्या मतदानाचा हक्क बजावत मुस्लिम समाजातील चांगल्या नेतृत्वाला निवडून द्या.’

    Maharashtra TimesMaharashtra Elections : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांना एप्रिलचा मुहूर्त? दोन गोष्टींचा ठरतोय अडसर
    भाजपची टीम बी असल्याचे आरोप झिडकारत ते म्हणाले, ‘मी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देऊन थकलो आहे. वास्तविक पाहता, आम्ही बिहारमध्ये भाजपला हरविण्यासाठी पाच जागा मागितल्या होत्या. पण, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आम्हाला पाच जागा दिल्या नाहीत. प्रत्येक वेळी निवडणूक आली की सेक्युलरिजम धोक्यात असल्याचा नारा देण्यात येतो. हा नारा देणारे लोक सर्वाधिक धोकादायक आहेत. त्यांनी सातत्याने मुसलमानांचे नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न केला आहे. आमची मुले जेव्हा तुरुंगात वर्षानुवर्षे सडतात तेव्हा यांचा सेक्युलरिजम कुठे जातो, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.

    Maharashtra TimesUddhav Thackeray : ‘खरा मित्र तोच जो चुका दाखवतो’; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल मोठं विधान
    मोदी, काँग्रेसवर टीका
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे, नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांना सोबत घेऊन वक्फविरोधी कायदा आणला आहे. जेव्हा यावर संसदेत चर्चा झाली होती तेव्हा मी मोदी सरकारचे मनसुबे उघड केले होते. या कायद्याच्या आधारे आपल्या वक्फच्या जागा हडपण्यात येतील किंवा त्यांचे अस्तित्व संपविण्यात येईल, अशी भीती खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केली. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या भारतविरोधी धोरणांवर मोदी आणि भाजपचे तोंड उघडत नाही. ज्या चीनने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला मदत केली, त्यांना आज आपण रेड कार्पेट घालून गुंतवणुकीचे आमंत्रण देतोय. ही भाजपची स्थिती आहे’, असे ते म्हणाले

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा