मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, १९५२ मध्ये जन्माला आलेल्या पक्षाला आजही दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यावी लागतात. २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याचे आश्वासन दिले होते, पण ते फिरकलेच नाहीत.
२०१२ मध्ये नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आली. त्या कालावधीत झालेल्या कामांचा उल्लेख राज यांनी केला. ‘पाच वर्षांमध्ये इतकी कामं करुनही जनतेनं पराभव केला. भाजपच्या भुलथापांना लोक बळी पडले, याचं वाईट वाटतं,’ अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये प्रचाराला आले. नाशिकमध्ये सत्ता द्या. मी नाशिकला दत्तक घेतो म्हणाले. पुढे तो बाप नाशिककडे फिरकलाच नाही, अशा शब्दांत राज यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
भाजप कार्यकर्त्यांनी 50 खोक्यांवरुन डिवचले, शिवसैनिक संतापले; AB फॉर्म काढला, भाजप उमेदवाराची गोची
नाशिक दत्तक देण्याचं आवाहन करताना फडणवीस यांनी नाशिककरांना कोणकोणती आश्वासनं दिली होती, याची यादीच राज ठाकरेंनी वाचून दाखवली. मी प्रकल्पांची, योजनांची नावं वाचतो. तुम्हीच सांगा, यातली किती आश्वासनं पूर्ण झाली, असं राज ठाकरे गर्दीला उद्देशून म्हणाले. नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक आयटी पार्क, नाशिक लॉजिस्टिक पार्क, द्वारका नाशिक उड्डाणपूल, नाशिक बाह्य रिंग रोड, नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग, इगतपुरीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, अशी फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची यादीच राज यांनी वाचून दाखवली. त्यावर समोरील गर्दीनं हे प्रकल्प पूर्णच झाले नसल्याचं सांगितलं.
50 खोके, सॉरी सॉरी; 11 खोके, एकदम ओक्के! शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांसमोर भाजपची जोरदार घोषणा
नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना २०१२ मध्ये कुंभमेळा झाला होता. त्यावेही एकही झाड तोडलं गेलं नव्हतं, असं राज म्हणाले. त्यावेळी मनसेची सत्ता होती. उत्तम नियोजन झालं. साधू संतांनी समाधान व्यक्त केलं. सगळ्याच पक्षांनी सहकार्य केलं. तेव्हा एकही झाड न तोडता कुंभमेळा झाला. मग आता झाडं का तोडावी लागत आहेत, असा सवाल राज यांनी विचारला. उद्योगपतींसाठी जमिनी मोकळ्या करायच्या. आधी तिथे कुंभमेळा घ्यायचा आणि मग हव्या असलेल्या उद्योगपतीच्या घशात घालायचा, असा यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.
