Thane Elections: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केले. एका कारणामुळे नमते घेतल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. ठाण्यातील दळणवळण, मेट्रो, रेल्वे आणि जलवाहतूक प्रकल्पांची माहिती दिली.
ठाण्यात मुख्यमंत्र्यांची मुलाखत
ठाणे भाजपतर्फे बुधवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ‘आपलं ठाणे, आपला देवाभाऊ’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधला. ठाण्यातील दळणवळण, कचरा प्रश्न, पाणीपुरवठा, शिक्षण आणि रोजगार अशा विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी अभ्यासपूर्ण आणि खुमासदार शैलीमध्ये उत्तरे दिली.
Thane Election: शिंदेंच्या रोडशोनंतर ठाण्यात आता ठाकरेंची एन्ट्री; आजपासून ‘ठाकरे ब्रँड’चा प्रचार होणार सुरू
‘पाप करणारे नगरसेवक होतात, आणि महापाप करणारे महापौर होतात, असे नागपूर महापालिकेत नगरसेवक आणि महापौर असताना मी गमतीशीरपणे म्हणायचो. सध्याचे काही नगरसेवक वॉर्डाचे मालक असल्याचे समजायला लागले आहेत. आपल्या वॉर्डामधील नागरिकांचे प्रश्न सोडवणे, सेवा सुविधा देण्यासाठी निवडण्यात आले आहे. माझ्याशिवाय इथली सुईही हलू नये, अशा मानसिकता घातक असून ती बदलायला हवी. सेवेचा भाव यायला हवा’, अशा शब्दांमध्ये नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचे कानही फडणवीस यांनी उपटले.
Uddhav Thackeray : मनसेसोबत युतीतून काय नवीन शिकायला मिळालं? उद्धव ठाकरे म्हणाले, आता आमच्यामध्ये…
मेट्रोची कामं केली
मुंबई महानगर प्रदेशामध्ये सुरू असलेल्या विविध दळणवळणाच्या प्रकल्पांबद्दल विस्तृत माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘पाच वर्षांमध्ये ४७५ किमी मेट्रोचे नियोजन करून त्याची कामे सुरू करण्यात आली आहे. २०२८-२९ पर्यंत त्यापैकी बहुसंख्य मेट्रो सुरू होणार असून २०३० पर्यंत ठाणे मेट्रोसह सर्व मेट्रो प्रकल्पांचा लाभ नागरिकांना घेता येईल’, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘याशिवाय मध्य रेल्वेच्या सर्व लोकल एसीमध्ये रूपांतरित होऊन प्रवाशांना सेकंड क्लासच्या भाड्यामध्ये हा प्रवास करता येईल.
देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा भूमिका बदलली, भाजपकडून मनसेवर होणाऱ्या टीकेला संदीप देशपांडेंचं उत्तर
बुलेट ट्रेनही २०२८ पर्यंत नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होईल. किनारा मार्गाचा विस्तार, उन्नत मार्ग, लिंक रोड, नवे महामार्ग आणि २१ जलवाहतूक केंद्रांच्या मदतीने ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी दूर करण्यास मदत होईल’, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
