• Tue. Jun 9th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar : ना कोणती सभा ना कोणता मोर्चा, विषय होता साडीचा… 5000 ची फक्त… छ. संभाजीनगरमध्ये गर्दीत ३ महिला बेशुद्ध

    Chhatrapati Sambhajinagar : ना कोणती सभा ना कोणता मोर्चा, विषय होता साडीचा… 5000 ची फक्त… छ. संभाजीनगरमध्ये गर्दीत ३ महिला बेशुद्ध

    chhatrapati sambhajinagar saree sale News : छत्रपती संभाजीनगरमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त साडीच्या दुकानात झालेल्या गर्दीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. मकरसंक्रांतीच्या आधी दुकानदाराने लावलेल्या सेलमधील साडी विकत घेण्यासाठी ही गर्दी झाली, पोलिसांनाही यावं लागलं होतं, कारण चेंगराचेंगरी झाली होती. जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छ. संभाजीनगर, सुशील राऊत : छत्रपती संभाजीनगरमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त एका मोठ्या ऑफरमुळे प्रचंड गर्दी उसळली. ५ हजार रुपयांची साडी केवळ ५९९ रुपयांत मिळत असल्याने हजारो महिलांनी दुकानांवर गर्दी केली. या चेंगराचेंगरीत तीन महिला बेशुद्ध पडल्या आणि काही मुले आपल्या आई-वडिलांपासून ताटातूट झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी दुकान बंद केले.

    छत्रपती संभाजीनगरातीलआकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात ( Chhatrapati Sambhajinagar Tenz Saree Centre) मकरसंक्रांतीनिमित्त साड्यांवर मोठ्या सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. यामुळे महिलांची प्रचंड गर्दी जमली. विशेषतः, ५ हजार रुपयांची साडी केवळ ५९९ रुपयांत मिळत असल्याने सुमारे हजारो महिलांनी दुकानांवर अक्षरशः झुंबड घातली. Maharashtra TimesCrime News: बारावीच्या विद्यार्थ्याला विकली स्पोर्ट्स बाईक, 5 महिने पैसे दिले नाही म्हणून भररस्त्यात मुलाला… थरारक Video समोर

    या गर्दीमुळे परिसरात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात तीन महिला बेशुद्ध पडल्या. तसेच, काही लहान मुले आपल्या पालकांपासून दुरावली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी Chhatrapati Sambhajinagar Tenz Saree Centre तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

    Maharashtra TimesPune Crime: हातपाय चिकटपट्टीने बांधले अन् पाळण्याच्या दोरीने…; 2 वर्षीय लेकीला संपवून आईनेही संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण समोर

    दरम्यान, या घटनेमुळे सणासुदीच्या काळात अशा मोठ्या सवलतींच्या जाहिराती करताना सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा सुरक्षा बंदोबस्त, रांगा, प्रवेश-निर्गमन व्यवस्था नसल्याने हा गोंधळ झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही महिलांना किरकोळ दुखापती झाल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिसांनी हरवलेल्या मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. प्रशासनाने भविष्यात अशा ऑफरपूर्वी योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले असून दुकानदारांनाही जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा