• Wed. Jun 17th, 2026
    Ajit Pawar: …तर नावाचा अजित पवार नाही; बाणेरच्या प्रचारसभेत अजितदादांचं तुफान भाषण

    म.टा.प्रतिनिधी, पुणे: रखडलेल्या समान पाणीपुरवठा योजनेमुळे सूस, पाषाण, बाणेर, बालेवाडी, औंध, बोपोडी परिसरातील सोसायट्यांना टँकरवर लाखो रुपये खर्चावे लागत आहेत. कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा नागरिकांना त्रास होत आहे. लगतच्या पिंपरी-चिंचवडचा मी १९९२ ते २०१७ दरम्यान कायापालट केला. तसा पुण्यातही करून दाखवेन; अन्यथा अजित पवार नाव सांगणार नाही. त्यासाठी कारभारी बदलून मला संधी द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी केले.

    या वेळी सर्व उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते. भाजपसह अन्य काही पक्षांतील कार्यकर्त्यांनी या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. केंद्र व राज्यात सत्ता असून, भरीव निधी मिळूनही इच्छाशक्तीअभावी कारभाऱ्यांनी समस्या सोडवल्या नाहीत, असे पवार म्हणाले. थोडा पाऊस झाला, की पुणे शहर तुंबते. नदीकाठची निळी रेषा, लाल रेषेचा प्रश्न सुटलेला नाही. कोयता गँग, गाड्या फोडणाऱ्या टोळ्या, वाढती गुन्हेगारी यांवर वचक राहिलेला नाही. आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असे पवार म्हणाले.

    Pune Crime: धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन 30 वर्षीय तरुणाने दिला जीव; दोन महिलांसह 7 जणांवर गुन्हा, काय कारण?
    समस्या सोडविण्यासाठी कठीण निर्णय घेण्याची धमक माझ्यात आहे. मी कामाचा माणूस आहे. माझे उमेदवार निवडून देऊन माझे हात भक्कम करा. मी पुण्याचा चेहरामोहरा बदलून दाखवीन, असेही पवार म्हणाले.

    भाजपने खंजीर खुपसला
    विधानसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द न पाळता भाजपने माझ्या पाठीत खंजीर खुपसला; पण अजित पवार खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. भाजपने केलेला विश्वासघात विसरणार नाही, असे अमोल बालवडकर म्हणाले.

    आधी ईव्हीएम, आता बिनविरोधचे निमित्त
    मुंबई :
    ‘महायुतीच्या निवडणुकीतील विजयाचे खापर आधी विरोधक ‘ईव्हीएम ‘वर फोडत होते. आता ते बिनविरोध निवडीचे निमित्त शोधत आहेत. महायुतीचा उमेदवार अपराजित आहे, असे वाटून विरोधी उमेदवारांनी माघार घेतली आणि बिनविरोध झाले. आमच्यासोबत आणखी काहींचेही बिनविरोध निवडून आले,’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांची रविवारी रात्री कांदिवली येथे प्रचारसभा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावरही टीका केली.

    Maharashtra TimesPune Crime: हातपाय चिकटपट्टीने बांधले अन् पाळण्याच्या दोरीने…; 2 वर्षीय लेकीला संपवून आईनेही संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण समोर
    एकत्र आल्यास समाधान
    पिंपरी :
    ‘ राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही समाधान वाटेल,’ असे मोठे वक्तव्य खासदार नीलेश लंके यांनी केले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

    प्रचाराच्या रणनीतीवर भर
    छत्रपती संभाजीनगर :
    निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक सातमधील २१, २२ आणि २७ प्रभागांत एकूण ८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ९१ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतरही बहुतांश प्रभागात अटीतटीच्या लढती होत आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती बारगळल्यानंतर बहुरंगी लढती होणार आहेत. शिवसेना, भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed