अमरावतीत जागावाटपाचा पेच सुटण्याऐवजी युतीच तुटल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. भाजप आणि शिवसेनेत नेमकं कुठे बिनसलं?
गेल्या आठवडाभरापासून भारतीय जनता पक्ष शिवसेना (शिंदे) व आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीत युतीसाठी चर्चा सुरू होती. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ७६ जागा लढवून ४५ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत सेनेद्वारा ३५ जागांची मागणी करण्यात आली होती. युतीमध्ये राणांच्या पक्षाची अडचण नसताना सेनेकडून मात्र ३५ जागेसाठी रस्सीखेच सुरु होती. सुरुवातीला नागपूर येथे चर्चा झाल्यानंतर त्यातूनही युतीचा मार्ग सुकर झाला नाही. यानंतर अमरावतीमध्ये सेनेचे मंत्री संजय राठोड भाजप आमदार संजय कुटे, माजी आमदार, भाजप पदाधिकारी किरण पातुरकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर व अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. परंतु त्यातही मार्ग निघाला नाही.
दोन दिवसापूर्वी अमरावती मध्ये आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी देखील पदाधिकाऱ्यांना युतीचा कानमंत्र दिला होता. यानंतर शनिवारी राज्याचे महसूल व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सेनेला १२ जागा देण्याची कबूल केल्याची माहिती पुढे आली होती. यादरम्यान रविवारी युती तुटल्याची सेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. परंतु यासाठी घोषणा करण्याकरता आयोजित पत्र परिषद ऐनवेळी रद्द करण्यात आली होती. बोलणी सुरू असल्याचे सांगितले गेले. सोमवारी पुन्हा अमरावतीच्या हॉटेलमध्ये शिवसेनेचे मंत्री संजय राठोड व भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
Central Railway schedule update: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! 1 जानेवारीपासून मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा बदलणार; ‘वंदे भारत’सह अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे फेरबदल
बैठक सुरू असताना रात्री आठ वाजताची सुमारात सेना पदाधिकारी व माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता अचानक बैठक सोडून निघून गेली होते. उद्या पत्रकाप परिषदेत या संबंधात घोषणा करू, असे त्यांनी सांगितले होते. युतीबाबत संजय राठोड बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
यानंतर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास भाजप व सेनेत जागा वाटपावरून एकमत झाले नाही. भाजपने आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या नाही. जागा वाटपात पारदर्शकता नाही, असा आरोप सेना पदाधिकारी व माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला आहे. आम्हाला जागा वाटपात उमेदवारी दिली जात असताना त्या जागी आमच्या विरोधात युवा स्वाभिमानी पार्टीच्या कार्यकर्त्याला उभे करण्यात आले आहे. या कारणांना पुढे करत शिवसेना (शिंदे) पक्षाने बाहेर पडणे पसंत केले आहे. यामुळे अमरावतीमध्ये भाजप शिवसेना युती तुटल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे.
भाजप शिवसेना यांच्यातील दुभगल्याने आता भाजप आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी सोबत लढणार आहे. यासोबतच महायुतीमधील सेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) देखील स्वतंत्रदेखील ही निवडणूक लढणार आहे.
जगदीश गुप्ता सेनेतून बाहेर
शिवसेनेचे नेते तथा माझी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आपल्या सोबत पक्षाने केलेले कमिटमेंट अद्यापही पूर्ण झालेले नाही. सध्याच्या राजकारणात आपण व्यवस्थित बसत नाही. परिणामी आपण शिवसेना बाहेर पडत असून लवकरच राजकीय संन्यास देखील घेण्याचे संकेत त्यांनी दिले.
