• Fri. Mar 6th, 2026
    Ramdas Athawale: मुंबईत रिपब्लिकन पक्षाला किमान 16 जागा मिळाव्यात; रामदास आठवलेंची मागणी

    Ramdas Athawale: मुंबई महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला किमान 16 जागा मिळाव्यात, अशी रामदास आठवलेंनी मागणी केली आहे.

    ramdas athawale(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्यात. महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलाविले नाही आणि चर्चेत सहभागी करून घेतले नाही. त्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सोमवारी मांडणार आहोत.

    अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापूर्वी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडून सन्मानजनक जागा मिळतील,’ असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच, कोणत्याही परिस्थितीत रिपाइं महायुतीसोबतच राहील, याची ग्वाही त्यांनी दिली.

    Maharashtra TimesUddhav Thackeray: दोन गुजराती आपल्याला गिळायला निघाले, पण…; उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र, काय म्हणाले?
    मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाने २६ जागा निश्चित केल्या होत्या. त्याची यादी महायुतीच्या नेत्यांकडे देण्यात आली होती. त्या २६ जागांपैकी किमान १६ जागा रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात, अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. ‘राज्यात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट असले तरी माझा सर्वांत मोठा गट आहे. आमचा पक्ष ज्यांच्यासोबत जातो त्यांचा विजय होतो,’ असे ते म्हणाले

    काँग्रेस-‘वंचित’ची मुंबईत आघाडी
    मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसने आपला पवित्रा बदलत रविवारी वंचित बहुजनसह आघाडी जाहीर केली. निवडणुकीमध्ये वंचितने ४२ जागांची मागणी केली असताना प्रत्यक्षात त्यांना ६२ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी ही नैसर्गिक युती आहे. दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे, अशी भूमिका या वेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मांडली.

    Maharashtra TimesBMC Election : काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या जागा ‘वंचित’ला, मुख्यालय असलेला प्रभागही सोडला, बड्या नेत्यांची नाराजी
    ‘वंचित’कडे मोक्याचे प्रभाग
    मुंबई : काँग्रेसने वंचितसोबत आघाडीची घोषणा केल्यानंतर गवई गट आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षालाही काही जागा देण्याचे निश्चित केले आहे. या ६२ जागांमध्ये काँग्रेसने आपले प्राबल्य असणाऱ्या पाच ते सहा जागा वंचितला सोडल्याने काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय ज्या प्रभागात येते, तो प्रभागही वंचितसाठी सोडल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा