Ratnagiri Accident News : रत्नागिरीत कार आणि दुचाकीच्या अपघातात एका महिलेच्या डोक्यावरुन ट्रकचं चाक जाऊन दुर्घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
राजापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवार सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. दुचाकी आणि कारच्या धडकेनंतर रस्त्यावर पडलेल्या या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचं चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Chandrapur News : शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली, पण नावापुरते पैसे मिळाले; भयंकर रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाईंड अटकेत
पिंपळे सौदागर येथील रहिवासी तेजस शेलार हे आपल्या क्रेटा गाडीने (एमएच 14, एमएल 9618) पुण्याहून कुणकेशश्वर येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यांच्या गाडीत लहान मुलं आणि इतर कुटुंबीय असे प्रवासी होते. रायपाटण टक्केवाडी येथे त्यांची गाडी आली असता, पाचल गुरववाडी येथील दुचाकीस्वार कुणाल धावडे याने आपल्या दुचाकीने कारला मागून धडक दिली. या अनपेक्षित धडकेमुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या पार्वती तरळ या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या.
डंपरचा अपघात, कुटुंबाचा आक्रोश… पोलिसांनी सांगितलं पुणे अपघाताचं वास्तव
दुर्दैवाने याच वेळी रत्नागिरीहून पाचलच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक (एमएच 08, एक्यू 7266) तेथून जात होता. रस्त्यावर पडलेल्या पार्वती या दुर्दैवाने या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्या. चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक संतोष सिद्धार्थ सावंत हा रत्नागिरीहून माल वाहतूक करत होता.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे आणि रामदास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अपघाताच्या वेळी घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांसह रायपाटण टक्केवाडीच्या पोलीस पाटील मृण्मयी रवींद्र पांचाळ आणि गांगणवाडीचे पोलीस पाटील स्वप्नील गांगण उपस्थित होते.
