• Sun. Mar 8th, 2026
    शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार, दोन विभक्त नगर परिषदा ते एकत्र महापालिका, KDMC महापालिकेबद्दल A टू Z माहिती

    कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक महत्त्वाची आहे. कारण शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण आता भाजप प्रचंड ताकद लावताना दिसत आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती झाली आहे. त्यामुळे केडीएमसी निवडणुकीत या होणार? याबाबत सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मनसे-शिवसेना (ठाकरे) युतीची घोषणा केली. ही युती मुंबई महापालिकेसह ठाणे, मीरा-भाईंदर, पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही असण्याची दाट शक्यता आहे. केडीएमसी महापालिका सध्या चर्चेत आहे. कारण या ठिकाणी भाजप स्वबळावर लढण्यासाठी सज्ज झाली आहे. तर पडद्यामागे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात युतीच्या देखील चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. असं असलं तरी भाजपने इथे मंगळवारी रात्री भव्य कार्यकर्ता मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात भाजपच्या नगरसेवकांना सर्वाधिक निवडून आणण्याबाबत भाष्य झालं. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचं राजकारण कुठपर्यंत जाणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, या महापालिकेचा नेमका इतिहास काय आहे? ते जाणून घेऊयात.

    कल्याण आणि डोंबिवली हे दोन शहरं आहेत. सध्याच्या घडीला मुंबई शहर हे विस्तारलं जात आहे. या विस्तारणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय भागात कल्याण डोंबिवली हे शहरं देखील महत्त्वाची आहेत. मुंबई महापालिका इतकीच इथली कल्याण डोंबिवली महापालिका देखील महत्त्वाची आहे. कारण या महापालिकेचं क्षेत्र देखील तितकं विस्तारलं गेलं आहे. या महापालिकेच्या हद्दीत लोकसंख्यादेखील तितकी मोठी आहे. त्यामुळे ही महापालिका प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची आहे.

    कल्याण शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच कल्याणच्या बंदरावर स्वराज्याचं पहिलं आरमार उभारलं आहे. शिवरायांच्या या इतिहासाची साक्ष देणारा दुर्गाडी किल्लादेखील इथे आहे. कल्याण हे शतको वर्षांपासूनचं व्यापाऱ्याचं अतिशय महत्त्वाचं बंदर राहिलेलं आहे. विशेष म्हणजे सातवाहन, शिलाहार, मराठा आणि ब्रिटिश काळात कल्याणचे व्यापारी महत्त्व कायम होते. तर डोंबिवली हे 1960 नंतर नियोजित वसाहत, औद्योगिक आणि मध्यमवर्गीय शहर म्हणून विकसित झाले.

    कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांना पूर्वी स्वतंत्र नगरपरिषद होत्या. पण वाढती लोकसंख्या, नागरी समस्या आणि शहरी विस्तार या गोष्टी लक्षात घेऊन 1 ऑक्टोबर 1983 रोजी कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांची कल्याण डोंबिवली महापालिकेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या महापालिकेला महत्त्व आहे. ही शहरं मुंबईपासून जवळ असल्यामुळे केडीएमसी महापालिकेकडे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक महत्त्वाची महापालिका म्हणून पाहिलं जातं.

    कल्याण डोंबिवली महापालिकेवर सुरुवातीच्या काळात काँग्रेसचा प्रभाव होता. 1993 ते 90 च्या काळात इथे काँग्रेसची मजबूत ताकद होती. पण त्यानंतर शिवसेनेचा उदय झाला आणि राजकीय परिस्थिती हळूहळू बदलत गेली. 1990 ते 2005 पर्यंत भाजपची इथे अबाधित सत्ता राहिली. यानंतर 2010 मध्ये मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा इथे प्रभाव बघायला मिळाला होता. त्यामुळे इथे त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली. 2015 च्या काळातही शिवसेना महापालिकेतला सर्वात मोठा पक्ष ठरला. इथे शिवसेना-भाजपची खमकी युती राहिली. पण नंतर परिस्थिती बदलत गेली. तसेच 2020 पासून इथे निवडणूक रखडलेली राहिली. अखेर आता महापालिका निवडणुका होत आहेत. यामध्ये कोणत्या पक्षाची ताकद जास्त असेल ते पाहणं महत्त्वाचं राहील.

    विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत राजकारण फार वेगळ्या वळणावर आलेलं आहे. ठाकरे बंधू 18 वर्षांनी एकत्र आलेले आहेत. त्यांची कल्याण डोंबिवलीत युती झाली तर त्याचा किती परिणाम इथल्या स्थानिक राजकारणावर पडतो? ते पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच भाजपची देखील इथे ताकद आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा ताबा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे इथले खासदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा देखील हा भाग बालेकिल्ला मानला जातोय. या सर्व परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आरपीआयदेखील आपलं अस्तित्वा दाखवून देताना दिसणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक फार चुरशीची ठरणार आहे. या निवडणुकीत कुणाची सरशी होईल आणि महापौर कोणत्या पक्षाचा बसेल? हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा