केवळ काहीशे मतदार असलेल्या एका प्रभागातील निवडणूक निकालाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मतदान, लढत आणि निकालामागचा ‘ट्विस्ट’ जाणून घ्या.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकूण २५६ मतदार नोंदणीकृत होते. यापैकी १७८ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. मतदानाच्या आकडेवारीनुसार काँग्रेस उमेदवाराला ३४ मते मिळाली, अपक्ष उमेदवाराला ५५ मते मिळाली, तर नोटाला १ मत पडले. अशा परिस्थितीत मतांचे स्पष्ट विभाजन झाले होते. या विभाजनाचा फायदा मीनाक्षी भुते यांना झाला आणि त्यांनी सर्वाधिक ८९ मते मिळवत विजय संपादन केला.
या प्रभागात एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेकडून मीनाक्षी भुते, काँग्रेसकडून एक उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार अशी थेट लढत होती. कमी मतदारसंख्या असल्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत होते. स्थानिक पातळीवरील संपर्क, घराघरात पोहोचलेला प्रचार आणि नागरिकांच्या प्रश्नांवर केंद्रित भूमिका यामुळे मीनाक्षी भुते यांना मतदारांचा विश्वास मिळवले.
Solapur News: बँकेत नोकरी करायची होती, पण नशिबात ‘नगराध्यक्षपद’ होतं; 22 वर्षीय सिद्धीची इनसाईड स्टोरी, आता म्हणते, आमदार होणार….
विजयानंतर प्रतिक्रिया देताना मीनाक्षी भुते म्हणाल्या, प्रभाग क्रमांक 1 हा सर्वात लहान प्रभाग असला तरी येथील नागरिकांचा विश्वास माझ्यासाठी खूप मोठा आहे. एकूण २५६ मतदारांपैकी मला ८९ मते मिळाली आणि ३४ मतांची आघाडी घेत मी विजयी झाले. या विजयामागे शिवसेनेचे संघटन, कार्यकर्त्यांची मेहनत आणि नागरिकांचा पाठिंबा आहे. त्यांनी पुढे सांगितले की, प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, तसेच महिला व युवकांसाठी विकासात्मक कामांना प्राधान्य दिले जाईल.
कांद्री नगरपंचायतीतील हा निकाल दाखवतो की, केवळ मोठी मतसंख्या किंवा मोठा प्रभाग असणेच विजयाचे मोजमाप नसते, तर स्थानिक प्रश्नांची जाण, विश्वासार्ह नेतृत्व आणि थेट संवाद यामुळेही निवडणूक जिंकता येते. मीनाक्षी भुते यांचा हा विजय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारणात ‘लहान प्रभागातून मोठा संदेश’ देणारा ठरला आहे.
