Pune Metro News : पुणेकरांसाठी मेट्रोचा नवा मार्ग लवकरच सुरू होणार असून या मार्गामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 मुळे वाहतूककोंडी देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो लाईन 3 पुढील वर्षी सुरू होणार आहे. 23.3 किमी लांबीचा हा मार्च 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गिकेमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. शिवाय आणि सध्या सुरू असलेल्या इतर मेट्रो मार्गांवरही गर्दी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Pune Metro : पुण्यात मेट्रो स्थानकांच्या नावांत बदल, फलक बदलण्याचं काम सुरू; कुठे-कोणत्या स्टेशनची नावं बदलली?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचं काम वेळेत पूर्ण करून पुढील 31 मार्चपर्यंत सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या मार्गिकेमुळे हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्कला जोडलं जाईल. तसंच सध्याच्या मेट्रो लाईन 1 आणि लाईन 2 सिव्हिल कोर्ट स्टेशनजवळ स्कायवॉकद्वारे जोडली जाईल. या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
Pune News : पुण्यात ११ किमीहून लांब डबलडेकरचा मार्ग, दुहेरी उड्डाणपुलावरुन मेट्रो; कुठून-कुठे, कशी असेल मार्गिका?
आणखी दोन मार्गांसाठी केंद्र सरकारची मंजुरी
केंद्र सरकारने पिंपरी-चिंचवड ते निगडी आणि खराडी ते खडकवासला या मार्गांच्या विस्तारालाही मंजुरी दिली आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गाचं काम वेगाने सुरू असून, सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गाचं काम तांत्रिक कारणांमुळे रखडलं आहे. त रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या मार्गांचं काम लवकरच सुरू होईल.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर मेट्रोनं प्रवास करण्याची वेळ, पाटलांना वाहतूक कोंडीचा फटका
पुणे मेट्रोच्या विस्ताराचं काम लवकरच सुरू होणार आहे. रामवाडी ते वाघोली आणि वानवडी ते चांदणी चौक या मार्गांवर काम सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय, पुणे मेट्रो वडगाव ते कात्रज (मुंबई-बंगळूर बायपास मार्गे), वडगाव ते चाकण, खराडी ते पुणे विमानतळ, शिवाजीनगर ते कोंढवा, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड रेल्वे या नवीन मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची शक्यता आहे. पुणे मेट्रोच्या या विस्तारांमुळे शहराच्या विविध भागांना जोडले जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल.
