NMIA Free Wi-Fi: नवी मुंबई विमानतळ तीन दिवसांत कार्यान्वित होणार असून, प्रवाशांसाठी ‘Adani OneApp’ आणि मोफत वाय-फायसह अनेक सुविधा उपलब्ध असतील. हे अॅप व्हर्च्युअल असिस्टंटसारखे काम करेल, ज्यामुळे प्रवाशांना फ्लाइट अपडेट्स आणि मार्गदर्शन मिळेल.
प्रवाशांना सहाय्य करण्यासाठी अॅप
विमानतळावर पॅसेंजर कम्युनीकेशन सिस्टम सुरू करण्यात येणार असून, त्यासोबतच प्रवाशांना मोफत Wi-Fi सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. OneApp हा प्रवाशांसाठी व्हर्च्युअल सहाय्यक काम करेल. रेल्वेच्या m-Indicator प्रमाणेच हा अॅप प्रवाशांना फ्लाइटविषयक अपडेट्स देईल. तसेच विमानतळावरील महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत पोहचण्यासाठी मार्गदर्शनही करेल.
Navi Mumbai : हॉटेलमध्ये जेवण, बाहेर कारफोड; ऐरोलीत गोपनीय माहिती असलेला लॅपटॉप चोरीला, विमानतळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कशा असतील सुविधा
या अॅपद्वारे प्रवाशांच्या मोबाईल फोनवर थेट फ्लाइट स्थिती सूचना, बोर्डिंग गेटची माहिती, वेळापत्रक आणि इतर कार्यात्मक सूचना मिळणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना वेळेवर माहिती देणे तसेच प्रत्यक्ष माहिती काउंटर आणि स्थिर डिस्प्ले बोर्डवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. Adani OneApp मध्ये खाद्यपदार्थ व पेय दुकाने, किरकोळ विक्रीची दुकाने, लाउंज तसेच इतर टर्मिनल सुविधांची माहितीही देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावरील वेळेचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता येणार आहे.
या संपूर्ण टर्मिनलमध्ये 10 Mbps पर्यंत वेगाने मोफत Wi-Fi सुविधा देण्यात येणार आहे. विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गर्दीच्या वेळीही नेटवर्कमध्ये खोळंबा न होण्यासाठी ही प्रणाली बनवण्यात आली आहे. त्यामुळे मेसेजिंग, डिजिटल पेमेंट, अॅप-आधारित टॅक्सी बुकिंग, ई-मेल, स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ कॉल सहज शक्य होणार आहेत. याशिवाय नवी मुंबई विमानतळाने BSNL सोबत भागीदारी केली असून, त्यामुळे नेटवर्क कनेक्टिव्हिटीसंबंधी कोणत्याही अडचणी येणार नाहीत. या विमानतळामुळे मुंबईतील दुसऱ्या विमानतळावरील ताण कमी होणार असून, महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणी मिळणार आहे.
Navi Mumbai: 190 कोटींचा खर्च, 21 मजली भव्य बांधकाम; नवी मुंबईतील महत्त्वाचा बस डेपो 6 वर्षांनंतर सुरू; वैशिष्ट्ये काय?
19,650 कोटी रुपयांच्या खर्चाने बांधलेल्या या विमातळावर पहिल्या टप्प्यात दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. कालांतराने, हे विमानतळ 90 दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे मुंबईच्या सध्याच्या विमानतळावरील ताण कमी होतील, तसेच या प्रदेशातील हवाई वाहतुकीच्या दीर्घकालीन वाढीलाही पाठिंबा मिळेल.
