shrivardhan nagar parishad result 2025 : श्रीवर्धन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या गटाचा विजय मिळवला असून तटकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
अॅड. अतुल चोगले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवली होती, पण निकाल लागताच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचं तोंडभरुन कौतुक केल्याने ते आपली राजकीय दिशा बदलणार का? अशा चर्चांना जिल्ह्यात उधाण आलं आहे.
तटकरे गटाला पराभवाचा धक्का
माजी नगराध्यक्ष अभिनंदन जितेंद्र सातनाक यांचा या निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला. सातनाक हे तटकरे गटाचे विश्वासू आणि प्रभावी नेते मानले जात असल्याने त्यांच्या पराभवामुळे तटकरे गटाला हा मोठा राजकीय धक्का असल्याचं बोललं जात आहे.
Election Result : अजितदादांचे ‘शरद पवार’ विजयी, चुरशीच्या लढतीत भाजपला मोठा धक्का, कुठे घडलं?
स्थानिक पातळीवर गेल्या काही काळापासून नागरिकांमध्ये असलेली नाराजी, रखडलेली विकासकामं, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांबाबतचे प्रश्न आणि बदलती राजकीय हवा या सर्व घटकांचा या निकालावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. मतदारांनी या निवडणुकीत बदलाला पसंती देत नव्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
‘कोण होतास तू, काय झालास तू? मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं सुरु करावं’, Uddhav Thackeray यांचा खोचक सल्ला
निकाल जाहीर होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी श्रीवर्धन शहरात जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि अभिनंदनाचे फलक यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी हा विजय म्हणजे स्थानिक राजकारणातील नवे पर्व असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष अॅड. अतुल चोगले यांनी श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासासाठी निर्णय घेतले जातील. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांना प्राधान्य दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
काल एका मंत्र्याने राजीनामा दिला, आता लवकरच दुसरा मंत्री राजीनामा देणार; ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
या निकालामुळे श्रीवर्धन नगरपरिषदेतील सत्तासमीकरण पूर्णतः बदललं असून आगामी काळात स्थानिक राजकारण अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. तटकरे गटासाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा इशारा ठरला असताना, ठाकरे गटासाठी हा विजय नव्या उमेदीने काम करण्याची संधी मानला जात आहे.
