Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका ३५ वर्षीय युवा शेतकऱ्याने जीवन संपवले. घरची हलाखीची परिस्थिती आणि कर्जाच्या चिंतेने तो नैराश्यात होता. तरूण मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे बुलढाण्यात एका पस्तीस वर्षीय शेतकरी पुत्राने स्वतःच्याच शेतात जाऊन गोंधणीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 19 डिसेंबर रोजी मेरा खुर्द येथे सकाळी उघडकीस आली. अंधेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथील रहिवासी असलेले गंगाराम हरिभाऊ उदार यांना दोन मुले असून एकत्र कुटुंब पद्धत. यांच्याकडे मेरा खुर्द शेती शिवारात गट नंबर 221 मध्ये कोरडवाहू जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा खुर्द शाखेचे 31 हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. तसेच त्यांचा मुलगा अनिल गंगाराम उदार यांनी बालाजी अर्बन चिखली पतसंस्थेकडून एक लाख 50 हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र यावर्षी शेतात पिकाचे उत्पन्न पाहिजेत असे झाले नाही म्हणून बँकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता अनिल उदारला लागली होती. घरची परिस्थिती फार हलाखीची असल्याने घरातील सर्वजण मोल मजुरी करून कुटुंबाचा उदार निर्वाह चालवत असतं.
Buldhana News: ट्रकच्या भीषण धडकेत हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; डोळ्यांदेखत पत्नी अन् चिमुकली… हृदयद्रावक घटनेनं सर्वत्र हळहळ
एकीकडे घरची हलाखीची परिस्थिती आणि दुसरीकडे बँकेच्या कर्जाची परतफेड या विवांचनेत अनिल उदार हा घरात नैराश्यामध्ये जीवन जगत होता. मात्र त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या परिवार सदस्यांना कधी ते जाणू दिले नाही. वारंवार नैराश्याच्या अंधार वातावरणात विचारात तो जात असताना. मी शेतातून येतो हे त्याचे अखेरचे शब्द. मात्र त्याच वेळेस त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे. हे त्याच्या घरातील सदस्यांनी ओळखलं नाही. आणि 19 डिसेंबर रोजी शेतात जातो हे त्याचे अखेरचे शब्द अनिल शेतात गेला आणि घेतला टोकाचा निर्णय स्वतःच्या शेतातील गोंदणीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला आणि आपली जीवन यात्रा संपवली.
Buldhana News : नियतीचा क्रूर डाव! मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतला जगाचा निरोप, दोघांनाही… महाराष्ट्रातील काळीज पिळवटून टाकणारी घटना
ज्यावेळेस त्याचा भाऊ संजय शेतात गेला त्यांनी दुरूनच आपल्या भावाची परिस्थिती पाहिली. त्यांनी त्याला घट्ट मिठी मारून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर होऊन गेला होता .आपल्या डोळ्यासमोरच ही सर्व घटनाक्रम पाहून त्याने आरडाओर केला. घटनेची माहिती त्यांनी सरपंच रमेश अवचार पोलीस पाटील, संजय ठाकूर यांना दिली असता. त्यांनी तात्काळ ठाणेदार रमेश शक्करगे यांना कळविले. पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन त्यांचा समक्ष पंचनामा करून मर्ग दाखल केला. मात्र या घटनेमुळे अनिल उदार हा घरातील करता पुरुष गेल्याने आई-वडील ,पत्नी ,दोन मुले भाऊ यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नका..!
ज्या परिस्थितीत सध्या बळीराजा आपल्या काळया मातीमध्ये कष्ट करत असताना निसर्गासोबत दोन हात करत आहे. अनेक निसर्गाच्या चक्रव्यात अडकला आहे. असं असलं तरी आपल्या परिवाराला कायमचं अंधारात सोडून. आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नका हीच म्हणण्याची वेळ किंबहुना त्यांना धीर देण्याची वेळ आता आली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
