Western Railway 30 Days Block : बोरिवलीपर्यंत सहावी लाईन सुरू होणार आहे. या कामासाठी 20 डिसेंबरपासून ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्या उशिराने धावतील किंवा रद्द होतील.
20 डिसेंबर ते 18 जानेवारीपर्यंत ब्लॉक
सहाव्या लाईनच्या कामासाठी 20 डिसेंबर 2025 पासून पुढे 30 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही लोकल गाड्या उशिराने धावतील किंवा काही रद्द होतील. बोरिवली स्टेशनवर काही गाड्यांचा थांबा देखील रद्द केला जाईल. पाचवी लाईन प्रवासी गाड्यांसाठी बंद राहील. इतर मार्गांवर गाड्यांचा वेग कमी केला जाईल. पाचव्या लाईनवरून धावणाऱ्या सर्व गाड्या, मेल आणि लोकल अंधेरी-गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान फास्ट लाईनवर चालवल्या जातील.
Train Ticket Rule : कन्फर्म सीट, वेटिंग लिस्ट की RAC… रेल्वेकडून तिकीट रिझर्व्हेशनबाबत नवा आदेश; प्रवाशांना मोठा फायदा
या 30 दिवसांच्या ब्लॉक काळात, 20 डिसेंबर 2025 च्या रात्रीपासून ते 18 जानेवारी 2026 पर्यंत काम चालेल. या काळात 8 अप आणि 10 डाऊन गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात येईल. तसंच 112 अप आणि 9 डाऊन गाड्यांना उशिराने धावण्याची शक्यता आहे. या काळात पाचवी लाइनदेखील बंद राहील. 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर या पाच दिवस रात्री 11 वाजल्यापासून ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत काम चालेल.
Karjat – Panvel Railway : कर्जत-पनवेल लोकल लवकरच सुरू, 300 मीटर लांबीचा बोगदा पूर्ण; कुठे-कसा आहे मार्ग?
सहावी लाईन कांदिवलीपर्यंत सुरू, आता बोरिवलीपर्यंत कामाला वेग
बोरिवली आणि वांद्रे दरम्यान पाचवी लाईन आधीच सुरू झाली आहे. सहावी लाईन गोरेगावपर्यंत नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू झाली आणि कांदिवलीपर्यंत ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झाली होती. सध्या ही लाईन वांद्रे टर्मिनस ते कांदिवली दरम्यान धावते. या लाईनवरुन दररोज जवळपास 20 मेल धावतात. आता कांदिवली ते बोरिवली या सेक्शनमध्ये सहाव्या लाईनचं काम सुरू होत आहे.
सहाव्या लाईनचे फायदे
सहाव्या लाईनच्या कामामुळे कांदिवली आणि बोरिवली इथे ट्रॅक सरळ करणं, अनेक क्रॉसओवर जोडणं आणि काढणं यांचा समावेश आहे. इंजिनिअरिंग, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड संबंधीत कामं केली जातील.
Central Railway च्या फेऱ्या वाढणार, मात्र प्रवाशांना होणार मनस्ताप; फक्त CSMT Kalyan फास्ट ट्रेन?
सहाव्या लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गांवरील गर्दी कमी होईल. दोन्ही मेल आणि लोकल रेल्वे वाहतूक विभागली जाईल. त्यामुळे वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यानची गर्दीही कमी होईल. मेलसाठी सहाव्या लाईनमुळे वेगळा मार्ग तयार होईल, त्यामुळे लोकलसाठी जास्त जागा मिळेल. याचा परिणाम असा, की लोकल वेळेवर धावतील, याचा प्रवाशांना मोठा फायदा होईल.
